शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

450 जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप

By admin | Updated: October 6, 2015 23:10 IST

उपक्रम : विज्ञानच्या १२ विद्यार्थ्यांना दिलासा

नाशिक : विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथेच विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याची समाजकल्याण विभागाच्या उपक्रमाचा लाभ अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला आहे. केटीएएचएम महाविद्यालयातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कमी कालावधित जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे श्रम व वेळेची बचत होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे, असे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृह येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन अधिकारी खुशाल गायकवाड, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील उपस्थितीत होते. समाजकल्याण विभागाने राबविलेल्या उपक्रमानुसार थेट जनतेमध्ये जाऊन त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केटीएचएम महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. जात पडताळणी समितीने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली असल्याचेही धोंडगे म्हणाले. याप्रसंगी खुशाल गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावरील ताण कमी होणार आहे. त्यांना कमी वेळेत प्रमाणपत्र देण्यास आपण कटिबद्ध आहोत. अशा प्रकारचा उपक्रम नाशिकमध्ये प्रथमच राबविण्यात आला असून, नाशिक हे पहिले शहर असल्याचेही गायकवाड म्हणाले. महाविद्यालयातच प्रकरण तपासणी करून वैधता प्रमाणपत्र देणारी नाशिकची समिती एकमेव समिती असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)