शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:32 IST

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यमस्वरूपाच्या असलेल्या २४ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. धरणांची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने एकाच वेळी जवळपास तेरा धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाचे मुबलक प्रमाण, धरणांतील साठा, नद्या, नाल्यांना आलेला पूर पाहता जमिनीखालील पाण्याच्या पातळीतही जवळपास चार ते पाच फूट पाण्याची पातळी वाढल्याने यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्वच धरणांमध्ये सरासरी ९९ टक्के जलसाठा कायम होता. त्यानंतर मात्र सिंचनाचे आवर्तन धरणांमधून सोडण्यात आले, त्याचबरोबर धरणांमध्ये विविध कारणांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण सोडण्यात आले. अशातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले.जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, त्यात आता फक्त २८ हजार ९३७ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहिले आहे. म्हणजेच धरणांमध्ये ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी दारणा धरणात ७६ टक्के इतके शिल्लक असून, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात यंदा ४१ टक्के पाणी असून, ओझरखेड ४८, चणकापूर ३८, हरणबारी ५५, पालखेड ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा प्रकार पाहता उपलब्ध ४४ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.--------गंगापूर समूहात ४९ टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात सध्या ४९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांवर होते. सध्या गंगापूर धरणात ४४, कश्यपीत ८९, गौतमी गोदावरीत ३४ व आळंदीमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. त्याचबरोबर एचएएल, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज निर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक