शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

42 हजार टन द्राक्षांची निर्यात

By admin | Updated: March 3, 2017 00:21 IST

निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

निफाड : भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. सध्या द्राक्ष हंगाम बहरात असून, निर्यातक्षम द्राक्षांची मागणी युरोप, रशिया आदि देशांत असल्याने यावर्षी २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषत: महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला १०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्षनिर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु पये व काळी द्राक्ष ६० ते ७० रुपये सरासरी भावाने निर्यात होत आहे. सुरुवातीला काही निर्यातदारांनी साखर कमी असूनही माल पाठवला. परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले. युरोपमध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे. रशियात ते ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. असे असले तरी मार्चअखेरपर्यंत चिलीचा माल संपेल आणि तपमान असेच वाढत गेले तर द्राक्षांना मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल. मात्र कोणतेही नैसर्गिक संकट या काळात यायला नको, असा आशावाद अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे यांनी व्यक्त केला. फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केटमध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल.मागील वर्षी युरोपमध्ये ८४ हजार मे. टन निर्यात झाली होती. आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे.टन इतकी असून, यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे.टनाच्याही पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला. साधारणत: युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशियामध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)