शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:51 IST

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना निधी उपलब्ध वीज वितरण कंपनीने दाखविली संवेदनशीलता

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीनेदेखील संवेदनशीलता दाखविल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यास मदत झाली.जिल्हा परिषदेने जिल्हा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण कंपनीकडून याकामी पुढाकार घेण्यात आल्याने ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती. यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणीपुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चालू वीजबिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लाख ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून ही योजना पूर्ववत सुरू झाली आहे. नाग्यासाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीपुरवठा विभागाला सूचना४२ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील देखभाल दुरु स्तीमधून वीज देयक भरण्यासाठी साडेसात लाख, तर देखभाल दुरु स्तीसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, वीज वितरण विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने ही योजना सुरू करण्यात यश आले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात अशाप्रकारे थकीत वीजबिलामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी