शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंधरा दिवसांत ४१ डेंग्यू रुग्ण : आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:43 IST

महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागरिक आणि व्यक्तिगत सोसायट्यांना नोटिसा बजावणे सुरू झाले असून, आता घर न घर तपासणी हाती घेण्यात येणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागरिक आणि व्यक्तिगत सोसायट्यांना नोटिसा बजावणे सुरू झाले असून, आता घर न घर तपासणी हाती घेण्यात येणार आहे.  जुलै महिन्याच्या प्रारंभी १६ जणांना डेंग्यू झाल्याचे महापालिकेच्या तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कामे सुरू करूनही डेंग्यु रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश गेल्याचे आठवड्यात दिले होते. मात्र डेंग्यू डासांचा उपसर्ग कमी होण्याची चिन्हे नाहीत उलट आत्तापर्यंत ४१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.  गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे जुलै महिन्यात ९४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यात फक्त१४ जणांना आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, यंदा गतवर्षीच्या जवळपास तिप्पट रुग्ण आढळले आहेत. याप्रकारामुळे चिंता वाढली आहे, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तातडीने उपाययोजना सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. डेंग्यू डासाची उत्पत्ती नागरी भागात घर आणि छतावरील पाण्यात होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा निचरा न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी महापालिकेने दंड थोपटले आहेत.  मुंबई महापालिकेच्या धर्तीवर डासांची उत्पत्ती होत असेल किंवा पाणी साचल्याने डासांच्या अळ्या होत असतील, अशा नागरिकांना तसेच सोसायटी आणि व्यापारी संकुलांवर धडक कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. सोसायट्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड केला जात असून, त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याशिवाय प्रत्येक घर न घर तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे प्रत्येक घर तपासून पाणी साचले आहे किंवा डासांची उत्पत्ती होते किंवा नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.तळघर बंद कोण करणार?शहरातील बहुतांशी व्यापारी संकुलांच्या तळघरात पाणी साचते. त्यामुळे तळघरे बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी गेल्या महिन्यातील आढावा बैठकीत दिले होते. मात्र, वैद्यकीय विभागाला हे शक्य नसून त्यांनी हे काम नगररचना विभागच करू शकत असल्याने नगररचना विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यू