शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत ४१ डेंग्यू रुग्ण : आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:43 IST

महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागरिक आणि व्यक्तिगत सोसायट्यांना नोटिसा बजावणे सुरू झाले असून, आता घर न घर तपासणी हाती घेण्यात येणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागरिक आणि व्यक्तिगत सोसायट्यांना नोटिसा बजावणे सुरू झाले असून, आता घर न घर तपासणी हाती घेण्यात येणार आहे.  जुलै महिन्याच्या प्रारंभी १६ जणांना डेंग्यू झाल्याचे महापालिकेच्या तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कामे सुरू करूनही डेंग्यु रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश गेल्याचे आठवड्यात दिले होते. मात्र डेंग्यू डासांचा उपसर्ग कमी होण्याची चिन्हे नाहीत उलट आत्तापर्यंत ४१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.  गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे जुलै महिन्यात ९४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यात फक्त१४ जणांना आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, यंदा गतवर्षीच्या जवळपास तिप्पट रुग्ण आढळले आहेत. याप्रकारामुळे चिंता वाढली आहे, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तातडीने उपाययोजना सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. डेंग्यू डासाची उत्पत्ती नागरी भागात घर आणि छतावरील पाण्यात होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा निचरा न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी महापालिकेने दंड थोपटले आहेत.  मुंबई महापालिकेच्या धर्तीवर डासांची उत्पत्ती होत असेल किंवा पाणी साचल्याने डासांच्या अळ्या होत असतील, अशा नागरिकांना तसेच सोसायटी आणि व्यापारी संकुलांवर धडक कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. सोसायट्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड केला जात असून, त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याशिवाय प्रत्येक घर न घर तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे प्रत्येक घर तपासून पाणी साचले आहे किंवा डासांची उत्पत्ती होते किंवा नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.तळघर बंद कोण करणार?शहरातील बहुतांशी व्यापारी संकुलांच्या तळघरात पाणी साचते. त्यामुळे तळघरे बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी गेल्या महिन्यातील आढावा बैठकीत दिले होते. मात्र, वैद्यकीय विभागाला हे शक्य नसून त्यांनी हे काम नगररचना विभागच करू शकत असल्याने नगररचना विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यू