शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात  तीन वर्षांत ४० बिबटे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:32 IST

विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दफ्तरी आहे.

नाशिक : विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दफ्तरी आहे.  नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वाढता अधिवास शुभवर्तमान मानले जात आहे. घाटनदेवीसह इगतपुरी तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे या भागात बिबट्यांचा अधिवास आढळतो. तसेच त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड, सिन्नर या तालुक्यांमध्येही बिबटे आढळून येतात. या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्गांवर बिबटे अपघातात ठार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. २०१६ ते २०१८ या वर्षांमध्ये (आॅक्टोबरपर्यंत) तब्बल ४० बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये २०१६ पर्यंत नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू होण्याच्या घटना कमी होत्या; मात्र त्यानंतर यामध्येही वाढ झाली. चालू वर्षी सात बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर या तीन वर्षांत नैसर्गिक कारणांमुळे १४ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. २०१६-१७ या दोन वर्षांत रस्ते अपघातात प्रत्येकी ४ तर यावर्षी आतापर्यंत तीन असे एकूण ११ बिबट्यांना रस्त्यावरील अपघातात जीव गमवावा लागला आहे. २०१६ पासून बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद नव्हती. यावर्षी एका बिबट्याची शिकार करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.अशी आहेत मृत्यूची कारणेविहिरीत पडून, रस्ते अपघात, आजारपण, नैसर्गिक, शिकार या कारणांमुळे बिबट्यांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने केली आहे. तसेच बिबट्यांचे पिल्लंदेखील कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावतात. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरींचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. तसेच शेतकºयांनी विहिरींवर संरक्षक जाळ्यादेखील बसविलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करताना बिबटे विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. विहिरींमध्ये सुरक्षित आधार सापडल्यास काही बिबट्यांना जिवंत बाहेर काढण्यासही वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे.शिका-यांची जिल्ह्यावर वक्रदृष्टीबिबट्यांची शिकार नाशिक जिल्ह्यात याअगोदर कधी झाल्याची नोंद वनविभागाकडे होऊ शकलेली नाही; मात्र यावर्षी एक बिबट्याची शिकार जिल्ह्याच्या हद्दीत झाली. त्यामुळे वनविभागापुढे आता शिकाºयांचे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक जिल्हा बिबट्यांचे माहेरघर बनू पाहत असताना शिकाºयांनी केलेली वक्रदृष्टी त्यास मारक ठरणारी आहे. वनविभागाने शिकाºयांपासून वन्यजीव कायद्यांतर्गत बिबट्यांना संरक्षण देण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग