शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:48 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी आतापर्यंत रिक्त असलेल्या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांना २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या मुदतीत अर्ज करता येणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ४ जूननंतर तिसरी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पहिल्या सोडतीत निवड झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसºया फेरीसाठी रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता एक ते तीन किमी अंतरासाठी सोडत जाहीर झाली. त्यात १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी केवळ ११९९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश दुसºया फेरीत निश्चित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पहिल्या फेरीतील २१८२ आणि दुसºया फेरीतील १११९ असे एकूण ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.तीन हजार दोनशे जागा रिक्तआरटीईअंतर्गत राखीव असलेल्या सहा हजार ५८९ जागांपैकी अजूनही तीन हजार २०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा