शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेशाची मागणी

By admin | Updated: October 6, 2015 22:28 IST

३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेशाची मागणी

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या गावांमध्ये महालगाव (गोल्हेवाडी) व परिसरातील वाड्या- वस्त्यांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिता केशव महाले व अमोल रामनाथ येवले यांनी निवेदनाद्वारे आमदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.सध्या नगरसूल गावात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेचे विस्तारीकरण करून योजनेत अजून १७ गावे जोडली जाणार आहे. परंतु गावात गोल्हेवाडी गावाचा समावेश नाही. गोल्हेवाडी येथे जिल्हा परिषद अंतर्गत शासन निधीतून विहीर खोदून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या विहिरीने तळ गाठल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण थोडाफार पाऊस झाला की हे टॅँकर बंद केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागातील लोकसंख्या सुमारे ११०० इतकी आहे. त्यामुळे या गावांचा ३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समवेश झाला तर परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.२ रोजी झालेल्या ग्रामसभेत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून, पाणीपुरवठा योजनेत महालगाव (गोल्हेवाडी), बहादुरे वस्ती, बारे वस्तीचा समावेश करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे शिफारस करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच प्रसाद पाटील यांनीदेखील अशा आशयाच्या मागणीचे पत्र दिले आहे. (वार्ताहर)