शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:52 IST

 आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

ठळक मुद्देआरटीईतून सूट  आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रक्रियेअंतर्गत सहभाग घेणाºया जवळपास ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून सूट मिळवली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी संपुष्टात आल्या आहेत.शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. परंतु, गेल्या वर्षभरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापासून ते वेगळ्या वर्गात बसविण्याच्या घटना घडल्यानंतर यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळांना आता अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना मिळणाºया सर्व सोयीसुविधा सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून मिळणार आहेत. परंतु, केवळ अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणाºया शिक्षणापासून वंचित झाले आहेत.