शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

फटाकेबंदीच्या निर्णयाबाबत ३४ शहरे अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:11 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उदासीनतेमुळे न्यायालयाचा हा निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले असून, १५ नोव्हेंबरला हा अहवाल सर्वोच्च न्यायालय व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे़नाशिक शहरातील मानव उत्थान मंच या स्वयंसेवी संस्थेने आपल्या ४० स्वयंसेवकांच्या मदतीने देशातील आठ राज्यांतील ४० प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले़ या सर्वेक्षणात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचला की नाही, या निर्णयाच्या प्रसाराबाबत संबंधित यंत्रणेने कोणती पावले उचलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कोठे व किती प्रमाणात झाले या बाबींचा समावेश होता़ या सर्वेक्षणासाठी दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या राज्यांचा व त्यातील प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला होता़ यामध्ये उत्तर भारतातील शहरांचा प्रामुख्याने समावेश होता़  मानव उत्थान मंचने केलेल्या या ४० शहरांच्या सर्वेक्षणात केवळ ३४ शहरांमधील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत माहितीच नसल्याचे समोर आलेआहे़ दरम्यान, येत्या १५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रार व पर्यावरण मंत्रालय यांच्याकडे या सर्वेक्षणाचा अहवाल पाठविला जाणार आहे़ तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणीसाठी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची विनंती केली जाणार आहे़या शहरांमध्ये सर्वेक्षणनाशिक, पुणे, नागपूर, नोयडा, गुरुगाव, भोपाल, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, सुरत, नवसारी, पटियाला, अंबाला, सेंधवा, इंदूर, ग्वालियर, आग्रा, औरंगाबाद, चेन्नई, श्रीगंगानगर, मथुरा, उज्जैन, सिमला, जयपूर, ढोलपूर, जयपूर, उदयपूर, सिमला, राजपुरा, रोपर, फरिदाबाद, गाझियाबाद, लखनऊ, रायपूर, अमृतरसर, लुधियाना, फतेहगड, पटना, धनबाद.पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर वेळेचे बंधन घालण्याचा चांगला निर्णय घेतला आहे़ मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी व जनजागृतीची जबाबदारी असणाºया संस्था मात्र अनभिज्ञ आहेत़ न्यायालयाने ही जबाबदारी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे विभागून देण्याची आवश्यकता आहे़ तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची तरतूद करावी़  - जसबिर सिंग, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी