शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

फटाकेबंदीच्या निर्णयाबाबत ३४ शहरे अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:11 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उदासीनतेमुळे न्यायालयाचा हा निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले असून, १५ नोव्हेंबरला हा अहवाल सर्वोच्च न्यायालय व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे़नाशिक शहरातील मानव उत्थान मंच या स्वयंसेवी संस्थेने आपल्या ४० स्वयंसेवकांच्या मदतीने देशातील आठ राज्यांतील ४० प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले़ या सर्वेक्षणात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचला की नाही, या निर्णयाच्या प्रसाराबाबत संबंधित यंत्रणेने कोणती पावले उचलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कोठे व किती प्रमाणात झाले या बाबींचा समावेश होता़ या सर्वेक्षणासाठी दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या राज्यांचा व त्यातील प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला होता़ यामध्ये उत्तर भारतातील शहरांचा प्रामुख्याने समावेश होता़  मानव उत्थान मंचने केलेल्या या ४० शहरांच्या सर्वेक्षणात केवळ ३४ शहरांमधील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत माहितीच नसल्याचे समोर आलेआहे़ दरम्यान, येत्या १५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रार व पर्यावरण मंत्रालय यांच्याकडे या सर्वेक्षणाचा अहवाल पाठविला जाणार आहे़ तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणीसाठी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची विनंती केली जाणार आहे़या शहरांमध्ये सर्वेक्षणनाशिक, पुणे, नागपूर, नोयडा, गुरुगाव, भोपाल, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, सुरत, नवसारी, पटियाला, अंबाला, सेंधवा, इंदूर, ग्वालियर, आग्रा, औरंगाबाद, चेन्नई, श्रीगंगानगर, मथुरा, उज्जैन, सिमला, जयपूर, ढोलपूर, जयपूर, उदयपूर, सिमला, राजपुरा, रोपर, फरिदाबाद, गाझियाबाद, लखनऊ, रायपूर, अमृतरसर, लुधियाना, फतेहगड, पटना, धनबाद.पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर वेळेचे बंधन घालण्याचा चांगला निर्णय घेतला आहे़ मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी व जनजागृतीची जबाबदारी असणाºया संस्था मात्र अनभिज्ञ आहेत़ न्यायालयाने ही जबाबदारी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे विभागून देण्याची आवश्यकता आहे़ तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची तरतूद करावी़  - जसबिर सिंग, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी