शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

फटाकेबंदीच्या निर्णयाबाबत ३४ शहरे अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:11 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उदासीनतेमुळे न्यायालयाचा हा निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले असून, १५ नोव्हेंबरला हा अहवाल सर्वोच्च न्यायालय व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे़नाशिक शहरातील मानव उत्थान मंच या स्वयंसेवी संस्थेने आपल्या ४० स्वयंसेवकांच्या मदतीने देशातील आठ राज्यांतील ४० प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले़ या सर्वेक्षणात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचला की नाही, या निर्णयाच्या प्रसाराबाबत संबंधित यंत्रणेने कोणती पावले उचलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कोठे व किती प्रमाणात झाले या बाबींचा समावेश होता़ या सर्वेक्षणासाठी दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या राज्यांचा व त्यातील प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला होता़ यामध्ये उत्तर भारतातील शहरांचा प्रामुख्याने समावेश होता़  मानव उत्थान मंचने केलेल्या या ४० शहरांच्या सर्वेक्षणात केवळ ३४ शहरांमधील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत माहितीच नसल्याचे समोर आलेआहे़ दरम्यान, येत्या १५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रार व पर्यावरण मंत्रालय यांच्याकडे या सर्वेक्षणाचा अहवाल पाठविला जाणार आहे़ तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणीसाठी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची विनंती केली जाणार आहे़या शहरांमध्ये सर्वेक्षणनाशिक, पुणे, नागपूर, नोयडा, गुरुगाव, भोपाल, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, सुरत, नवसारी, पटियाला, अंबाला, सेंधवा, इंदूर, ग्वालियर, आग्रा, औरंगाबाद, चेन्नई, श्रीगंगानगर, मथुरा, उज्जैन, सिमला, जयपूर, ढोलपूर, जयपूर, उदयपूर, सिमला, राजपुरा, रोपर, फरिदाबाद, गाझियाबाद, लखनऊ, रायपूर, अमृतरसर, लुधियाना, फतेहगड, पटना, धनबाद.पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर वेळेचे बंधन घालण्याचा चांगला निर्णय घेतला आहे़ मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी व जनजागृतीची जबाबदारी असणाºया संस्था मात्र अनभिज्ञ आहेत़ न्यायालयाने ही जबाबदारी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे विभागून देण्याची आवश्यकता आहे़ तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची तरतूद करावी़  - जसबिर सिंग, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी