शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जिल्ह्यातील सात डेपोंमधील ३० बसेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 01:24 IST

गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचारी संपावर कायम असताना, महामंडळाकडून सातत्याने बसेस सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सात आगारांमधून काही बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. या आठवड्यात आणखी बसेस रस्त्यावर येतील, असा दावा महामंडळाच्या आधिकाऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा दावा : ठक्कर स्थानकातून १६ खासगी शिवशाही

नाशिक : गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचारी संपावर कायम असताना, महामंडळाकडून सातत्याने बसेस सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सात आगारांमधून काही बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. या आठवड्यात आणखी बसेस रस्त्यावर येतील, असा दावा महामंडळाच्या आधिकाऱ्यांनी केला आहे.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या महिनाभरापासून नाशिक विभागातील एस.टी. कर्मचारी संपावर आहेत. शासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही एकमत होऊ शकलेले नसल्याने बससेवा अजूनही ठप्पच आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच, सात तारखेला कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार पगारही झाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दिवस भरले तेवढ्या प्रमाणात त्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले आहे. त्यानंतर लागलीच दुसऱ्यादिवशी काही चालक-वाहक कामावर परतल्याने जिल्ह्यात ३० बसेस सुरू करण्यात आल्याचा दावा महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड, सिन्नर, येवला, पिंपळगाव, नांदगाव, इगतपुरी आणि लासलगाव आगारांतील बसेस सुरू झाल्या आहेत. काही आगारांतून दोन ते तीन बसेस नाशिकपर्यंत धावल्याचे सांगण्यात आले. येवला येथून आलेल्या बसेसमधून ४१, पिंपळगाव येथून आलेल्या बसमध्ये ७, सिन्नर ४०, नांदगाव ३० , इगतपुरी ६, तर लासलागाव आगारातून सहा प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा केला जात आहे.

--इन्फो--

एस. टी. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या सात तारखेला वेतन जमा केले जाते. त्यानुसार गेल्या सात तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सुधारित वेतनश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाली असल्याने त्यानुसारच कर्मचाऱ्यांचे वेतन जमा झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काही प्रवासी कामावर परततील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे, तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने कर्मचारी बसेस काढणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. बोटावर मोजण्याइतपत एस.टी. कर्मचाऱ्यांनी गाड्या काढल्या आहेत, तर संपावरील कर्मचाऱ्यांची टक्केवारी ९८ टक्केपेक्षा अधिक आहे. असे असतानाही कर्मचारी कामावर परतण्याचा महामंडळाचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप