शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
3
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
4
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
5
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
6
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
7
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
8
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
9
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
10
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
11
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
12
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
13
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
14
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
15
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
16
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
18
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
19
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
20
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय

१४ हजार मतदानयंत्रे झाली जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:36 IST

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर ४५ दिवस सीलबंद करण्यात आलेल्या मतदान यंत्रांमधील डेटा डिलीट करून सदर यंत्रे पुन्हा वापरात आणली जात असल्याने जिल्ह्यातील सुमारे १४ हजार मतदानयंत्रांचा डेटा डिलीट करून सदर यंत्रे ही अगामी वर्षात होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील निवडणुकीसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्णातील मतदानयंत्रे अंबड येथील गुदामात पहिल्या पातळीतील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देयंत्रांमधील डेटा होणार डिलीट; दोन मतदारसंघांतील यंत्रे सुरक्षित

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर ४५ दिवस सीलबंद करण्यात आलेल्या मतदान यंत्रांमधील डेटा डिलीट करून सदर यंत्रे पुन्हा वापरात आणली जात असल्याने जिल्ह्यातील सुमारे १४ हजार मतदानयंत्रांचा डेटा डिलीट करून सदर यंत्रे ही अगामी वर्षात होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील निवडणुकीसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्णातील मतदानयंत्रे अंबड येथील गुदामात पहिल्या पातळीतील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातील १५ विधानसभा मतदारसंघापैकी मालेगाव आणि सिन्नर वगळता अन्य मतदारसंघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन जमा करण्यात आले आहे. सिन्नर आणि मालेगावमधील निकालावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे येथील मतदानयंत्रांमधील डाटा सुरक्षित ठेवला जाणार आहे. मात्र उर्वरित यंत्रांमधील डाटा डिलिट करून सदर यंत्रे बिहार येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर मतदानयंत्रे हे ४५ दिवस सुरक्षित ठेवले जातात. या यंत्रांमधील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी यंत्रांची काळजी घेतली जाते. या कालावधी कुणाचा आक्षेप आला नाही, तर सदर यंत्रांमधील मतदानाची आकडेवारी डिलिट केली जाते. त्यानुसार जिल्ह्णातील १३ मतदारसंघातील सुमारे १४ हजार यंत्रे निवडणूक शाखेने जमा केले असून, या यंत्रांची माहितीकाढून टाकली जाण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे.गेल्या आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गेल्या २४ आॅक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याने निकालाच्या ४५ दिवसांनंतर मतदानयंत्रामधील माहिती काढून सदर यंत्रे पुन्हा अन्य निवडणुकांसाठी वापरण्यात येतात. त्यानुसार आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे. विभागातील यंत्रांची प्रतीक्षानाशिक विभागातील नादुरुस्त मतदानयंत्रेदेखील नाशिकमध्ये जमा केली जाणार असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मतदानयंत्रे जमा करण्यासाठीचे पत्र जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आले आहे. येत्या १२ तारखेपर्यंत संबंधितांना मुदत देण्यात आली आहे. यातील मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली यंत्रे पुन्हा बंगळुरू येथील भेल कंपनीला परत पाठविली जाणार आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक