शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

समाजकल्याणचे ५० लाखही परतीच्या वाटेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 20:05 IST

केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे.

ठळक मुद्देराज्य शासन उदासीन : आंतरजातीय जोडपे वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या संसारास हातभार लागण्याच्या दृष्टीने व त्यांना एकमेकांमध्ये आर्थिकदृष्ट्या बांधून ठेवण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आर्थिक मदत देण्याची तरतूद असली तरी, गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या अडीच वर्षांपासून आंतरजातीय विवाह केलेले सुमारे चारशेहून अधिक जोडपे या योजनेच्या लाभापासून वंचित तर राहिलेच, परंतु या योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेला ५० लाखांचा निधीही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे.

केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे. दोघांनी लग्न केल्यानंतर त्या संदर्भातील विवाह प्रमाणपत्र तसेच दोघांचे जातीचे दाखले व विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे दाखल केल्यानंतर जोडप्यांना काही रक्कम रोख व काही रक्कम दोघांच्या संयुक्त बॅँक खात्यात विशिष्ट कालावधीसाठी जमा केली जाते. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारचा निम्मा वाटा अदा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने या योजनेसाठी आर्थिक तरतूदच केली नाही तर केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षासाठी नाशिक जिल्हा परिषदेला ५० लाखांचा निधी पाठविला आहे. मात्र जोपर्यंत राज्य सरकारची तरतूद प्राप्त होत नाही, तोपर्यंत योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची बाब समाजकल्याण आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली. केंद्र व राज्य सरकारच्या निधीच्या तरतुदीत दिवस वाया जात असले तरी, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे आंतरजातीय जोडप्यांचा अनुदान मागणीसाठी प्रस्ताव दाखल होत असून, सुमारे ४०० हून अधिक प्रस्ताव गेल्या अडीच वर्षांपासून पडून आहेत. यासंदर्भात मध्यंतरी खासदार डॉ. भारती पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाकडे पाठपुरावाही केला, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही शासन दरबारी व समाजकल्याण आयुक्तांकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. अशातच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले ५० लाख रुपये येत्या मार्च महिन्यापर्यंत खर्च करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसे न झाल्यास सदरचा निधी पुन्हा केंद्र सरकारकडे परत पाठवावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यास आहे ते ५० लाखही परत करावे लागणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद