शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

समाजकल्याणचे ५० लाखही परतीच्या वाटेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 20:05 IST

केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे.

ठळक मुद्देराज्य शासन उदासीन : आंतरजातीय जोडपे वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या संसारास हातभार लागण्याच्या दृष्टीने व त्यांना एकमेकांमध्ये आर्थिकदृष्ट्या बांधून ठेवण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आर्थिक मदत देण्याची तरतूद असली तरी, गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या अडीच वर्षांपासून आंतरजातीय विवाह केलेले सुमारे चारशेहून अधिक जोडपे या योजनेच्या लाभापासून वंचित तर राहिलेच, परंतु या योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेला ५० लाखांचा निधीही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे.

केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे. दोघांनी लग्न केल्यानंतर त्या संदर्भातील विवाह प्रमाणपत्र तसेच दोघांचे जातीचे दाखले व विहित नमुन्यातील अर्ज समाजकल्याण विभागाकडे दाखल केल्यानंतर जोडप्यांना काही रक्कम रोख व काही रक्कम दोघांच्या संयुक्त बॅँक खात्यात विशिष्ट कालावधीसाठी जमा केली जाते. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारचा निम्मा वाटा अदा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने या योजनेसाठी आर्थिक तरतूदच केली नाही तर केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षासाठी नाशिक जिल्हा परिषदेला ५० लाखांचा निधी पाठविला आहे. मात्र जोपर्यंत राज्य सरकारची तरतूद प्राप्त होत नाही, तोपर्यंत योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची बाब समाजकल्याण आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली. केंद्र व राज्य सरकारच्या निधीच्या तरतुदीत दिवस वाया जात असले तरी, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे आंतरजातीय जोडप्यांचा अनुदान मागणीसाठी प्रस्ताव दाखल होत असून, सुमारे ४०० हून अधिक प्रस्ताव गेल्या अडीच वर्षांपासून पडून आहेत. यासंदर्भात मध्यंतरी खासदार डॉ. भारती पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाकडे पाठपुरावाही केला, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही शासन दरबारी व समाजकल्याण आयुक्तांकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. अशातच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले ५० लाख रुपये येत्या मार्च महिन्यापर्यंत खर्च करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसे न झाल्यास सदरचा निधी पुन्हा केंद्र सरकारकडे परत पाठवावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यास आहे ते ५० लाखही परत करावे लागणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद