शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांचा निधी परत जाण्याच्या भीतीने साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:13 IST

राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च न करता परत जाण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे एकतर राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम द्यावी किंवा केंद्र सरकारने दिलेला निधी खर्चाची परवानगी द्यावी, अशी मागणी समाजकल्याण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभाग : ४८९ आंतरजातीय जोडपे लाभापासून वंचित

नाशिक : राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च न करता परत जाण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे एकतर राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम द्यावी किंवा केंद्र सरकारने दिलेला निधी खर्चाची परवानगी द्यावी, अशी मागणी समाजकल्याण विभागाने केली आहे.सोमवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंतरजातीय विवाह योजनेवर चर्चा करण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून त्याचबरोबर त्यांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी ५० हजार रुपये मदत देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.या योजनेसाठी केंद्र सरकारचा निम्मा वाटा व राज्य सरकारचा निम्मा वाटा असला तरी, राज्य सरकारचा हिस्सा गेल्या तीन वर्षांपासून प्राप्त झालेला नाही. उलट सन २०१८-१९ या वर्षात केंद्र सरकारने ५० लाख व २०१९-२० या वर्षासाठी ३० लाख असे ८० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.जोपर्यंत राज्य सरकार आपल्या हिश्श्याची रक्कम देत नाही तोपर्यंत लाभेच्छुकांना लाभ देऊ नये, अशा सूचना राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागाला ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा परिषदेकडे या योजनेंतर्गत निधी मागणीसाठी ४८९ प्रस्ताव प्राप्त झालेले असून, आंतरजातीय विवाह करणारी जोडपी निधीसाठी चकरा मारत आहेत. समाजकल्याण समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले सन २०१८-१९ वर्षातील ५० लाख रुपये मार्चअखेर खर्च न करता ते शासनाला परत करावे लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर सरकारकडे पैसे परत पाठविण्यापेक्षा केंद्र सरकारच्या निधीतून लाभेच्छुकांना त्याचे अनुदान वितरित करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

टॅग्स :marriageलग्न