शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

येवला तालुक्यात २९ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:52 IST

येवला : जिल्ह्यात मालेगावपाठोपाठ येवल्यातही रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी टप्प्याटप्प्याने २९ रुग्ण औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी चार राहिली आहे. तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने प्रशासनासह येवलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येवला : जिल्ह्यात मालेगावपाठोपाठ येवल्यातही रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी टप्प्याटप्प्याने २९ रुग्ण औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी चार राहिली आहे. तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने प्रशासनासह येवलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.येवला येथील आरोग्य यंत्रणाच कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहर व तालुक्यातील ३२ बाधितरुग्णांपैकी तब्बल २९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आता तालुक्यात केवळ तीनच रुग्ण राहिले आहेत. या तिघा रुग्णांवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचाराला या रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून न आल्याने येवल्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यास प्रशासनाला यश आले आहे.२३ एप्रिलपासून येवला शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आणि ३२ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली होती. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येऊन २८ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज एका कोरोनामुक्त रुग्णाला येथील कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाभूळगाव येथील कोविड केअर सेंटर व निर्धारित कोविड आरोग्य केंद्रात सद्यस्थितीला एकही रुग्ण नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक शैलजा कुप्पास्वामी यांनी दिली आहे.दरम्यान, २९४ व्यक्तींना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगीतले.---------------------------------------------दाभाडी गाव शंभर टक्के कोरोनामुक्तशीवरोड : दाभाडी गावात पंधरा कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यांना गावाबाहेरच असलेल्या शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या रुग्णावर विविध सामाजिक संस्था तसेच मराठा महासंघाचे सदस्य व गावातील विविध पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील विविध डॉक्टरांनी रुगणांची विशेष काळजी घेतल्यामुळे पंधराही रुग्णांचे दुसऱ्यांदा घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आले, यामुळे सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली तसेच विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना खबरदारी घ्यायला सांगितले आहे. भविष्यात पुन्हा कोरोनाचा सामना करण्याची गरज पडू नये यासाठी ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक