शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

२७ पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:00 IST

दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून, यात नाशिक विभागातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

नाशिक : दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून, यात नाशिक विभागातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकमधील जवळपास सातशे ते आठशे जागांसह राज्यातील तब्बल ५ हजार जागा कमी होण्याचे संकेत आहेत.तंत्रनिकेतन महाविद्यालयांना रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या फीमध्ये महाविद्यालयांचा खर्च भागविणे कठीण झाले असून, काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना शिक्षकांचे वेतन व अन्य खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होत नसल्याने राज्यातील अशा २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून महाविद्यालय बंद करण्याचे प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) सादर केले आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले असले तरी ही महाविद्यालये थेट बंद करता येणार नसल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात येत असून, महाविद्यालयातील शिकणाºया विद्यार्थ्यांची सुविधा, कर्मचारी, अन्य बाबी तपासून महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात विचार केला जाईल. महाविद्यालये बंद करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने वर्षनिहाय राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.विद्यार्थीच नसतील ती महाविद्यालये तत्काळ बंद होण्याची शक्यता आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र आता या अभ्यासक्रमांना दहावीच्या निकालाचा टक्का वाढल्याने उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षी अभ्यासक्रमाच्या तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यामध्ये नाशिक विभागातील मनमाड येथील शेजवळ पॉलिटेक्निक, जळगाव येथील एसएमटी पॉलिटेक्निक व डी फार्मसी आणि जीएस रायसोनी पॉलिटेक्निक महाविद्यालयांचा समावेश आहे.विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा आणि बारावीनंतर बी.एस्सी आयटी, बीएमएस यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाची ओढ यामुळे या पदविका अभ्यासक्रमाला फटका बसत आहे.अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार तंत्रशिक्षण पदविकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु, यातील १० टक्के जागा कमी झाल्याने आता पदवी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण पदविकेला प्रवेश आणखी घटण्याची शक्यता ओळखून राज्यातील २७ संस्थांनी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय