शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

By अझहर शेख | Updated: February 13, 2023 15:23 IST

नाशिक : ‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम ...

नाशिक :

‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम खुश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्यदलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा असा गुरुमंत्र स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर यांनी दिला.

भारतीय सैन्याचा पाठीचा कणा असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्राचा देदिप्यमान इतिहास आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांनी वैभवशाली कामगिरी करत देशसेवेत योगदान दिले आहे. ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असेही अय्यर यावेळी म्हणाले.

भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत पंचवीशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करुन दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २६००पेक्षा जास्त युवक याठिकाणी अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. ३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. तोफखान्यामधील प्रशिक्षकांकडून सैनिकी प्रशिक्षणाचे धडे त्यांना दिले जात आहेत. सोमवारी (दि.१३) सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शरिरासह मेंदूलाही सक्षम करा. यासाठी वाचनशक्ती विकसित करा. मेंदू शक्तीशाली नसेल तर बलवान शरिराचा उपयोग नाही. पहिल्या टप्प्यात सैन्यात दाखल होणाऱ्या अग्निवीरांच्या विक्रमांपासून येणारे भावी अग्निवीर प्रेरणा घेतील, अशी कामगिरी करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कुठलेही ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तल्लख, स्मार्ट बुद्धीमत्ता गरजेची असते, असे सांगत अग्निवीर आदर्श नागरिक व आधुनिक सैनिक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.