शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

By अझहर शेख | Updated: February 13, 2023 15:23 IST

नाशिक : ‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम ...

नाशिक :

‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम खुश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्यदलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा असा गुरुमंत्र स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर यांनी दिला.

भारतीय सैन्याचा पाठीचा कणा असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्राचा देदिप्यमान इतिहास आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांनी वैभवशाली कामगिरी करत देशसेवेत योगदान दिले आहे. ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असेही अय्यर यावेळी म्हणाले.

भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत पंचवीशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करुन दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २६००पेक्षा जास्त युवक याठिकाणी अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. ३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. तोफखान्यामधील प्रशिक्षकांकडून सैनिकी प्रशिक्षणाचे धडे त्यांना दिले जात आहेत. सोमवारी (दि.१३) सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शरिरासह मेंदूलाही सक्षम करा. यासाठी वाचनशक्ती विकसित करा. मेंदू शक्तीशाली नसेल तर बलवान शरिराचा उपयोग नाही. पहिल्या टप्प्यात सैन्यात दाखल होणाऱ्या अग्निवीरांच्या विक्रमांपासून येणारे भावी अग्निवीर प्रेरणा घेतील, अशी कामगिरी करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कुठलेही ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तल्लख, स्मार्ट बुद्धीमत्ता गरजेची असते, असे सांगत अग्निवीर आदर्श नागरिक व आधुनिक सैनिक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.