शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

By अझहर शेख | Updated: February 13, 2023 15:23 IST

नाशिक : ‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम ...

नाशिक :

‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम खुश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्यदलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा असा गुरुमंत्र स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर यांनी दिला.

भारतीय सैन्याचा पाठीचा कणा असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्राचा देदिप्यमान इतिहास आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांनी वैभवशाली कामगिरी करत देशसेवेत योगदान दिले आहे. ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असेही अय्यर यावेळी म्हणाले.

भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत पंचवीशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करुन दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २६००पेक्षा जास्त युवक याठिकाणी अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. ३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. तोफखान्यामधील प्रशिक्षकांकडून सैनिकी प्रशिक्षणाचे धडे त्यांना दिले जात आहेत. सोमवारी (दि.१३) सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शरिरासह मेंदूलाही सक्षम करा. यासाठी वाचनशक्ती विकसित करा. मेंदू शक्तीशाली नसेल तर बलवान शरिराचा उपयोग नाही. पहिल्या टप्प्यात सैन्यात दाखल होणाऱ्या अग्निवीरांच्या विक्रमांपासून येणारे भावी अग्निवीर प्रेरणा घेतील, अशी कामगिरी करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कुठलेही ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तल्लख, स्मार्ट बुद्धीमत्ता गरजेची असते, असे सांगत अग्निवीर आदर्श नागरिक व आधुनिक सैनिक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.