शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

By अझहर शेख | Updated: February 13, 2023 15:23 IST

नाशिक : ‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम ...

नाशिक :

‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम खुश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्यदलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा असा गुरुमंत्र स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर यांनी दिला.

भारतीय सैन्याचा पाठीचा कणा असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्राचा देदिप्यमान इतिहास आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांनी वैभवशाली कामगिरी करत देशसेवेत योगदान दिले आहे. ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असेही अय्यर यावेळी म्हणाले.

भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत पंचवीशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करुन दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २६००पेक्षा जास्त युवक याठिकाणी अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. ३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. तोफखान्यामधील प्रशिक्षकांकडून सैनिकी प्रशिक्षणाचे धडे त्यांना दिले जात आहेत. सोमवारी (दि.१३) सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शरिरासह मेंदूलाही सक्षम करा. यासाठी वाचनशक्ती विकसित करा. मेंदू शक्तीशाली नसेल तर बलवान शरिराचा उपयोग नाही. पहिल्या टप्प्यात सैन्यात दाखल होणाऱ्या अग्निवीरांच्या विक्रमांपासून येणारे भावी अग्निवीर प्रेरणा घेतील, अशी कामगिरी करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कुठलेही ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तल्लख, स्मार्ट बुद्धीमत्ता गरजेची असते, असे सांगत अग्निवीर आदर्श नागरिक व आधुनिक सैनिक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.