शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार महिन्यांत शहरात 22 खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:08 IST

साडेचार महिन्यांत शहरात 22 खून

विजय मोरे नाशिकपोलीस आयुक्तालयात गतवर्षभरात ४० खुनांच्या घटना होत्या़ या खुनाच्या घटनांमध्ये बहुतांशी खून हे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्यामुळे याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही़ मात्र, यावर्षी साडेचार महिन्यांतच खुनाने बाविशी गाठली असून, निम्मे वर्ष सरण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी अजून बाकी आहे़ खुनाच्या २२ घटनांमध्ये १८ पुरुष, ३ महिला व एक सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे़ खुनाची सुरुवातच सराईत गुन्हेगार आव्हाड व गवळे यांच्यापासून झाली होती़ पोलिसांचा धाक व दरारा नसल्यामुळेच वाहन जळीत कांड, खून तसेच गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे़नाशिक शहरात जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ५, मार्च १, एप्रिल ६, तर मे महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत खुनाच्या ४ घटना घडल्या आहेत़ यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाच-सहा खुनांच्या घटना वगळता बाकीच्या सर्व घटना या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत़ किरकोळ स्वरूपाच्या कारणावरून या खुनाच्या घटना घडत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे केवळ खूनच नव्हे तर वाहन जळीत कांड, हाणामाऱ्या, घरफोडी, लुटालूट या घटनाही मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येते़‘पोलीस म्हणजे जादूची कांडी नव्हे’ असे वक्तव्य करणाऱ्या एका माजी पोलीस आयुक्तांच्या काळात शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याने शासनाने त्यांची तत्काळ उचलबांगडी केली़ त्यानंतर शहरात एका कडक शिस्तीच्या आयुक्तांची नियुक्ती झाल्याने काहीकाळ शांतता निर्माण झाली होती़ तसेच या आयुक्तांच्या कार्यकाळातच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये आपसात भांडणे, खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचे काम गुंडच करीत असल्याने या खुनाच्या घटनांबाबत सर्वसामान्य नागरिक व पोलीस या दोघांना कसलेही सोयरसूतक नव्हते़सिंहस्थातील बंदोबस्ताचे नियोजनामध्ये अडकलेल्या नवनियुक्त पोलीस आयुक्त जगन्नाथन यांना सुरुवातीला कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देणे शक्य झाले नाही़ तसेच त्यांच्या मितभाषी स्वभावाचा फायदाही पोलीस अधिकाऱ्यांनी अलगद उचलला़ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धाक राहिला नसल्याने कोम्बिंग, आॅलआउट या नवीन संकल्पनांही हळूहळू बारगळत गेल्या़ शहरात रस्त्यावर पोलीस दिसेनासे झाले असून, महिन्यातून केव्हातरी थातूरमातूर कारवाई करून अधिकारीही धन्यता मानत असल्याचे चित्र आहे़