शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

साडेचार महिन्यांत शहरात 22 खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:08 IST

साडेचार महिन्यांत शहरात 22 खून

विजय मोरे नाशिकपोलीस आयुक्तालयात गतवर्षभरात ४० खुनांच्या घटना होत्या़ या खुनाच्या घटनांमध्ये बहुतांशी खून हे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्यामुळे याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही़ मात्र, यावर्षी साडेचार महिन्यांतच खुनाने बाविशी गाठली असून, निम्मे वर्ष सरण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी अजून बाकी आहे़ खुनाच्या २२ घटनांमध्ये १८ पुरुष, ३ महिला व एक सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे़ खुनाची सुरुवातच सराईत गुन्हेगार आव्हाड व गवळे यांच्यापासून झाली होती़ पोलिसांचा धाक व दरारा नसल्यामुळेच वाहन जळीत कांड, खून तसेच गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे़नाशिक शहरात जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ५, मार्च १, एप्रिल ६, तर मे महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत खुनाच्या ४ घटना घडल्या आहेत़ यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाच-सहा खुनांच्या घटना वगळता बाकीच्या सर्व घटना या सर्वसामान्यांशी निगडीत आहेत़ किरकोळ स्वरूपाच्या कारणावरून या खुनाच्या घटना घडत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे केवळ खूनच नव्हे तर वाहन जळीत कांड, हाणामाऱ्या, घरफोडी, लुटालूट या घटनाही मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येते़‘पोलीस म्हणजे जादूची कांडी नव्हे’ असे वक्तव्य करणाऱ्या एका माजी पोलीस आयुक्तांच्या काळात शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याने शासनाने त्यांची तत्काळ उचलबांगडी केली़ त्यानंतर शहरात एका कडक शिस्तीच्या आयुक्तांची नियुक्ती झाल्याने काहीकाळ शांतता निर्माण झाली होती़ तसेच या आयुक्तांच्या कार्यकाळातच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये आपसात भांडणे, खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचे काम गुंडच करीत असल्याने या खुनाच्या घटनांबाबत सर्वसामान्य नागरिक व पोलीस या दोघांना कसलेही सोयरसूतक नव्हते़सिंहस्थातील बंदोबस्ताचे नियोजनामध्ये अडकलेल्या नवनियुक्त पोलीस आयुक्त जगन्नाथन यांना सुरुवातीला कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देणे शक्य झाले नाही़ तसेच त्यांच्या मितभाषी स्वभावाचा फायदाही पोलीस अधिकाऱ्यांनी अलगद उचलला़ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धाक राहिला नसल्याने कोम्बिंग, आॅलआउट या नवीन संकल्पनांही हळूहळू बारगळत गेल्या़ शहरात रस्त्यावर पोलीस दिसेनासे झाले असून, महिन्यातून केव्हातरी थातूरमातूर कारवाई करून अधिकारीही धन्यता मानत असल्याचे चित्र आहे़