शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

जिल्ह्यातील २१२ सिंचन विहिरी अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सिंचन विहीर मंजूर केली जाते. वैयक्तिक लाभाची ...

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सिंचन विहीर मंजूर केली जाते. वैयक्तिक लाभाची ही योजना असून, ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सिंचन विहीर मंजूर करण्यात येते. यासाठी शासनाकडून तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. नाशिक जिल्ह्यात २१२ इतक्या सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असून, ८७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

गावातील नागरिक असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. प्रत्येक गावासाठी सिंचन विहीर मंजूर केली जाते. लोकसंख्येच्या तुलनेत नवीन सिंचन विहीर मंजूर केली. लोकसंख्या १,५०० असेल ५ सिंचन विहिरी, १,५०० ते ३,००० हजार असेल तर १०, ३,००० ते ५,००० हजार लोकसंख्येला १५ तर पाच हजारांपुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या २० सिंचन विहिरी मंजूर केल्या जातात.

सन २०२० पासून जिल्ह्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी ७,१२१ विहिरींची कामे सुरू करण्यात आलेली आहेत, तर योजनेच्या सुरुवातीपासून पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या ६,८२२ इतकी आहे. मार्च, २०२१ मध्ये २१२ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. याचाच अर्थ, ही कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. सन २०२१ मध्ये ८७ सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आलेली आहे.

अपुऱ्या पावसामुळे अनेकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम गावाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो. दुष्काळग्रस्त गावांना शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत केली जात असली, तरी शाश्वत उपायोजना करण्याच्या दृष्टीने शासनाकडून रोजगार हमीच्या माध्यमातून सिंचन विहीर योजना सुरू करण्यात आलेली आहे.

--इन्फो--

या योजनेच्या लाभासाठी प्रस्तावावर ग्रामसेवक आणि सरपंचांची स्वाक्षरी महत्त्वाची असते. जिल्ह्यात सुरू असलेल्या विहिरींची संख्या दिसत असली, तरी अनेक प्रस्ताव केवळ सरपंच आणि ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीविना पडून आहेत. विहिरीचा लाभ मिळविण्यासाठी प्रस्तावाची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धावाधाव करावी लागते. सर्व कागदपत्रे जमविली, तरी केवळ स्वाक्षरी अभावी प्रस्ताव बाजूला पडतात.

--इन्फो--

लाभार्थ्यांची पात्रता

१) लाभधारकाकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

२) प्रस्तावित विहीर ही पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरींपासून ५०० फुटांपेक्षा जास्त अंतर असावे.

३) प्रस्तावित विहिरींपासून पाच पोलच्या आत विद्युत पुरवठा उपलब्ध असावा.

४) लाभधारकाच्या सातबार उताऱ्यावर विहिरीची नोंद असू नये.

५) लाभधारकाकडून तलाठ्याच्या सहीचा एकूण क्षेत्राचा दाखला असला पाहिजे.

६) एकापेक्षा जास्त लाभधारक अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतात. त्यांचे एकूण जमिनीचे क्षेत्र ०.६० हेक्टरपेक्षा जास्त व सलग असावे.

७) लाभधारक हा जॉबकार्डधारक असला पाहिजे. त्याने मजूर म्हणून काम करून मजुरी घेणे अपेक्षित आहे.

८) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा यांच्याकडून करून घेणे अपेक्षित आहे.