शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

जिल्ह्यातील २१२ सिंचन विहिरी अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सिंचन विहीर मंजूर केली जाते. वैयक्तिक लाभाची ...

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सिंचन विहीर मंजूर केली जाते. वैयक्तिक लाभाची ही योजना असून, ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सिंचन विहीर मंजूर करण्यात येते. यासाठी शासनाकडून तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. नाशिक जिल्ह्यात २१२ इतक्या सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असून, ८७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

गावातील नागरिक असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. प्रत्येक गावासाठी सिंचन विहीर मंजूर केली जाते. लोकसंख्येच्या तुलनेत नवीन सिंचन विहीर मंजूर केली. लोकसंख्या १,५०० असेल ५ सिंचन विहिरी, १,५०० ते ३,००० हजार असेल तर १०, ३,००० ते ५,००० हजार लोकसंख्येला १५ तर पाच हजारांपुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या २० सिंचन विहिरी मंजूर केल्या जातात.

सन २०२० पासून जिल्ह्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी ७,१२१ विहिरींची कामे सुरू करण्यात आलेली आहेत, तर योजनेच्या सुरुवातीपासून पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या ६,८२२ इतकी आहे. मार्च, २०२१ मध्ये २१२ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. याचाच अर्थ, ही कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. सन २०२१ मध्ये ८७ सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आलेली आहे.

अपुऱ्या पावसामुळे अनेकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम गावाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो. दुष्काळग्रस्त गावांना शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत केली जात असली, तरी शाश्वत उपायोजना करण्याच्या दृष्टीने शासनाकडून रोजगार हमीच्या माध्यमातून सिंचन विहीर योजना सुरू करण्यात आलेली आहे.

--इन्फो--

या योजनेच्या लाभासाठी प्रस्तावावर ग्रामसेवक आणि सरपंचांची स्वाक्षरी महत्त्वाची असते. जिल्ह्यात सुरू असलेल्या विहिरींची संख्या दिसत असली, तरी अनेक प्रस्ताव केवळ सरपंच आणि ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीविना पडून आहेत. विहिरीचा लाभ मिळविण्यासाठी प्रस्तावाची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धावाधाव करावी लागते. सर्व कागदपत्रे जमविली, तरी केवळ स्वाक्षरी अभावी प्रस्ताव बाजूला पडतात.

--इन्फो--

लाभार्थ्यांची पात्रता

१) लाभधारकाकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

२) प्रस्तावित विहीर ही पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरींपासून ५०० फुटांपेक्षा जास्त अंतर असावे.

३) प्रस्तावित विहिरींपासून पाच पोलच्या आत विद्युत पुरवठा उपलब्ध असावा.

४) लाभधारकाच्या सातबार उताऱ्यावर विहिरीची नोंद असू नये.

५) लाभधारकाकडून तलाठ्याच्या सहीचा एकूण क्षेत्राचा दाखला असला पाहिजे.

६) एकापेक्षा जास्त लाभधारक अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतात. त्यांचे एकूण जमिनीचे क्षेत्र ०.६० हेक्टरपेक्षा जास्त व सलग असावे.

७) लाभधारक हा जॉबकार्डधारक असला पाहिजे. त्याने मजूर म्हणून काम करून मजुरी घेणे अपेक्षित आहे.

८) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा यांच्याकडून करून घेणे अपेक्षित आहे.