शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकरी आंदोलनासाठी २१ सदस्यीय सुकाणू समिती

By admin | Updated: June 6, 2017 03:03 IST

नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबे येथील शेतकऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक घेऊन शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी झालेल्या राज्य भरातील आंदोलनाचा आढावा घेऊन मंगळवारी (दि.६) बैठक घेणार असून, शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन करणार आहे. पुणतांबे येथील जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांनी यांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकरी संपात फूट पडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, शेतकरी संपात कोणतीही फूट पडली नसून राज्यातील शेतकरी अधिक आक्रमक होऊन संपात सहभागी झाला आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे कोणीही शेतकऱ्यांना आंधारात ठेवून अशा प्रकारे निर्णय घेऊन नये यासाठी नाशिकमधील बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संपाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समन्वयाचे काम करणार आहे. शेतीप्रश्नांना देशस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची ही नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये २१ जणांची नावे आहेत. सुकाणू समिती संदर्भात शेती अर्थतज्ज्ञ डॉ. गिरधर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबले आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली असून, या समितीमध्ये अजूनही काही राज्यभरांतील सदस्यांची नावे वाढणार आहे. ही समिती शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.