शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

२०३ आरक्षणे व्यपगत होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 4, 2016 00:24 IST

२०३ आरक्षणे व्यपगत होण्याच्या मार्गावर

नाशिक : १९९३ च्या विकास आराखड्यानुसार सद्यस्थितीत सुमारे २६५ आरक्षणांसाठी भूसंपादनाचे प्रस्ताव कार्यान्वित असून त्यापैकी कलम १२७ च्या नोटिसीनुसार २०३ आरक्षणे मुदतीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास व्यपगत होण्याच्या मार्गावर आहेत. सदर भूसंपादनाच्या प्रस्तावांचा फैसला प्रशासनाने स्थायी समितीच्या हाती सोपविला असून त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीसाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले जात आहेत. प्रामुख्याने, रखडलेल्या बांधकाम परवानग्या आणि मिळकतींचे १०० टक्के सर्वेक्षण या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्याचा निर्धार महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बोलून दाखविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समितीवर आरक्षित जागांच्या संपादनासाठीचे असंख्य प्रस्ताव मंजुरीसाठी येत आहेत. परंतु कोट्यवधी रुपयांच्या या प्रस्तावांसाठी एवढा पैसा प्रशासन आणणार कुठून असा सवाल सातत्याने स्थायी समितीत उपस्थित केला जात आहे. प्रशासनाकडे किरकोळ विकासकामांसाठी निधी नाही आणि भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये आहेत, असाही आक्षेप घेतला जात आहे. मागील स्थायीच्या बैठकीत सुमारे १४० कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव मान्यतेसाठी आले असता समितीने आयुक्तांच्या उपस्थितीतच त्यावर चर्चा करण्याची भूमिका घेतली. भूसंपादनाबाबत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, ज्यांची जमीन शासन अथवा महापालिकेने घेतली आहे, त्याला त्याचा योग्य न्याय्य मोबदला देणे आवश्यकच आहे. भूसंपादनासाठी एकदा आरक्षण टाकले की संबंधित जमीन मालकाला तेथे किमान १० वर्षांपर्यंत काहीच करता येत नाही. असे बंधन कायम राहिल्यावर जमीन मालकाला कायदेशीर आरक्षणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कलम १२७ नुसार नोटीस देण्याची कायद्यात तरतूद आहे. अशी नोटीस दिल्यानंतर १२ महिन्यांच्या आत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू न केल्यास आरक्षण व्यपगत होते. एकदा आरक्षण निश्चित झाले की, त्यात बदल करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. उपलब्ध निधीनुसार आणि आवश्यकतेनुसार जमीन संपादित करत राहणे व कायद्यातील तरतुदीस अधीन राहून योग्य तो मोबदला अदा करीत राहणे एवढेच कर्तव्य प्रशासनाचे असते. आरक्षणे व्यपगत झाल्यास त्यास सर्वच जबाबदार ठरतात. भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याने त्याबाबतचे प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने महासभेच्या शिफारशीनंतर ठरविलेली आरक्षणे व्यपगत होऊ न देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे १२७ ची नोटीस प्राप्त झालेले प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आलेले आहेत. जमीन मालकाला जोपर्यंत पूर्ण निधी अदा केला जात नाही तोपर्यंत द.सा.द.शे. १५ टक्के व्याज सुरू असते. त्यामुळे मोबदला लवकरात लवकर अदा करणे हे महापालिकेच्या हिताचे आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाने कलम १८ नुसार वाढीव मोबदला मंजूर केला आहे, त्या प्रकरणातही व्याज सुरू असते. अशा प्रकरणात मोबदला देणे आवश्यक असते. उच्च न्यायालयात अशा प्रकरणात अपील केले तरीदेखील सदर रक्कम जिल्हा न्यायालयात जमा करणे आवश्यक असते. कलम १२७ ची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल होतात. अशा प्रस्तावांमध्ये उच्च न्यायालय कालमर्यादा निश्चित करून देते. त्यामुळे अशी प्रकरणेही स्थायीवर ठेवली जातात. सद्यस्थितीत सुमारे २६५ भूसंपादनाचे प्रस्ताव कार्यान्वित असून त्यापैकी कलम १२७ नोटीस नुसार २०३ प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात येत आहेत. स्थायी समितीने त्याबाबत उचित निर्णय घ्यायचा आहे. त्याबाबतचा प्राधान्यक्रम स्थायीने मागितल्यास त्याबाबत प्रशासन क्रम ठरवून देईल, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)