शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाची २० टक्के रक्कम पडून

By admin | Updated: March 10, 2015 23:35 IST

एक लाख शेतकऱ्यांचा मदत घेण्यास नकार

नाशिक : खरीप हंगामात पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पाच ते दहा हजार रुपये मदत देऊ केल्यानंतर अवकाळी पावसाने घातलेल्या धिंगाण्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना प्रत्यक्षात खरीप हंगामातील पीक नुकसानीची मदत घेण्यास जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी नकार दिल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने दिलेल्या तीनशे कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम वाटप करण्यात येऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्या शोधाची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या हंगामात पावसाने भर पावसाळ्यात दांडी मारल्यामुळे त्याचा खरीप हंगामाच्या पिकांवर परिणाम झाला. साधारणत: आॅगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसाने नंतर मोठी ओढ दिली व त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर अखेर बरसल्याने पाहिजे त्या प्रमाणात पिकांची वाढ होऊ शकली नाही. उभी पिके करपू लागल्यामुळे शासनाने नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारीचा आढावा घेण्याबरोबरच पीक कापणी प्रयोगानेही शेतीचे अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेतला व त्यातून पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांसाठी डिसेंबरमध्ये आर्थिक मदत जाहीर केली. नाशिक जिल्ह्णातील सुमारे सव्वातेराशे गावांमधील खरीप हंगाम वाया गेल्याने शासनाने ३०१ कोटी रुपये मदत जाहीर केली होती. साधारणत: ४ लाख ८७ हजार ८८६ शेतकऱ्यांना ही मदत ३१ डिसेंबरच्या आत वाटप करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याने खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, त्यांच्या क्षेत्राची नोंद घेणे, जिल्हा बॅँकेकडे याद्या देऊन त्यांच्या खाते रक्कम जमा करणे, अशी सारी कामे महसूल यंत्रणेने युद्धपातळीवर पार पाडली असली, तरी अद्यापही जवळपास एक लाख शेतकरी ही रक्कम घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. जिल्ह्णात मदतपात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या व प्रत्यक्ष हवी असलेली रक्कम पाहता २८६ कोटी रुपयांची निकड पुरेशी असल्याने पंधरा कोटी रुपये शासनाला परत करण्यात आले, तर २५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र २० टक्के शेतकरी मदतीसाठी पुढेच येत नसल्याने सुमारे ३२ कोटी रुपये प्रशासनाकडे पडून आहेत. प्रत्यक्षात जवळपास एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या बॅँक खात्याची माहितीच यंत्रणेला दिलेली नाही. त्यामुळे नाशिक विभागात खरीप हंगामाची मदत वाटण्यात अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या नाशिक जिल्ह्णातील प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना करकचून ब्रेक लागला आहे. का नाकारली शेतकऱ्यांनी मदत?जिल्ह्णातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी खरिपाची मदत घेण्यास नकार देण्यामागे शेतकऱ्यांची उदासीनता व भाऊबंदकी हीच कारणे असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. बऱ्याचशा शेतजमिनींवर एकत्रित कुटुंबाचा हक्क असल्याने कोणाच्या बॅँक खात्यावर शासनाची मदत वर्ग करायची, असा भाऊबंदकीत कळीचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून जवळपास पाच-सहा टक्के शेतकऱ्यांनी बॅँक खात्याची माहिती दिलेली नाही, तर गावाकडच्या शेताकडे तीन-चार टक्के शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याचाही परिणाम मदत वाटपात झाला आहे.