शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

खरीप हंगामाची २० टक्के रक्कम पडून

By admin | Updated: March 10, 2015 23:35 IST

एक लाख शेतकऱ्यांचा मदत घेण्यास नकार

नाशिक : खरीप हंगामात पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पाच ते दहा हजार रुपये मदत देऊ केल्यानंतर अवकाळी पावसाने घातलेल्या धिंगाण्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना प्रत्यक्षात खरीप हंगामातील पीक नुकसानीची मदत घेण्यास जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी नकार दिल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने दिलेल्या तीनशे कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम वाटप करण्यात येऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्या शोधाची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या हंगामात पावसाने भर पावसाळ्यात दांडी मारल्यामुळे त्याचा खरीप हंगामाच्या पिकांवर परिणाम झाला. साधारणत: आॅगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसाने नंतर मोठी ओढ दिली व त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर अखेर बरसल्याने पाहिजे त्या प्रमाणात पिकांची वाढ होऊ शकली नाही. उभी पिके करपू लागल्यामुळे शासनाने नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारीचा आढावा घेण्याबरोबरच पीक कापणी प्रयोगानेही शेतीचे अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेतला व त्यातून पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांसाठी डिसेंबरमध्ये आर्थिक मदत जाहीर केली. नाशिक जिल्ह्णातील सुमारे सव्वातेराशे गावांमधील खरीप हंगाम वाया गेल्याने शासनाने ३०१ कोटी रुपये मदत जाहीर केली होती. साधारणत: ४ लाख ८७ हजार ८८६ शेतकऱ्यांना ही मदत ३१ डिसेंबरच्या आत वाटप करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याने खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, त्यांच्या क्षेत्राची नोंद घेणे, जिल्हा बॅँकेकडे याद्या देऊन त्यांच्या खाते रक्कम जमा करणे, अशी सारी कामे महसूल यंत्रणेने युद्धपातळीवर पार पाडली असली, तरी अद्यापही जवळपास एक लाख शेतकरी ही रक्कम घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. जिल्ह्णात मदतपात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या व प्रत्यक्ष हवी असलेली रक्कम पाहता २८६ कोटी रुपयांची निकड पुरेशी असल्याने पंधरा कोटी रुपये शासनाला परत करण्यात आले, तर २५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र २० टक्के शेतकरी मदतीसाठी पुढेच येत नसल्याने सुमारे ३२ कोटी रुपये प्रशासनाकडे पडून आहेत. प्रत्यक्षात जवळपास एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या बॅँक खात्याची माहितीच यंत्रणेला दिलेली नाही. त्यामुळे नाशिक विभागात खरीप हंगामाची मदत वाटण्यात अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या नाशिक जिल्ह्णातील प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना करकचून ब्रेक लागला आहे. का नाकारली शेतकऱ्यांनी मदत?जिल्ह्णातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी खरिपाची मदत घेण्यास नकार देण्यामागे शेतकऱ्यांची उदासीनता व भाऊबंदकी हीच कारणे असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. बऱ्याचशा शेतजमिनींवर एकत्रित कुटुंबाचा हक्क असल्याने कोणाच्या बॅँक खात्यावर शासनाची मदत वर्ग करायची, असा भाऊबंदकीत कळीचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून जवळपास पाच-सहा टक्के शेतकऱ्यांनी बॅँक खात्याची माहिती दिलेली नाही, तर गावाकडच्या शेताकडे तीन-चार टक्के शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याचाही परिणाम मदत वाटपात झाला आहे.