शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:08 IST

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवागदर्डीत २ जूनला पोहोचणार पाणीनागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे.

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे.दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडल्याने तेथील नागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे. धरण कोरडे होईपर्यंत तेथील मुख्याधिकाऱ्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांनी मनमाडसाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार करंजवणमधून वाघदर्डीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु धरणात पाणी पोहोचण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर करण्यात आले आहेत.जिल्ह्णात नांदगाव तालुक्यात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. जिल्ह्णात सर्वाधिक टॅँकर्स याच तालुक्यात सुरू असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातही मनमाडची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे मनमाडसाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी खासदार भारती पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार टॅँकर्स सुरू करण्यात येणार आहेत. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाडकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वास्तविक धरण कोरडे झाल्यानंतर करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी घेणे गरजेचे होते ते अगोदरच घेण्याचे नियोजन मुख्याधिकाºयांनी करून जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत जिल्हा पातळीवर काहीही नियोजन नसल्याकडे खासदार भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.येत्या २ जून रोजी करंजवणचे पाणी पालखेडमध्ये आणि तेथून ते वाघदर्डी धरणात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सुमारे ४९० एमसीएफटी पाणी वाघदर्डीत पोहोचणार आहे. त्यामुळे मनमाडकरांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी २० टॅँकर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत.