शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:08 IST

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवागदर्डीत २ जूनला पोहोचणार पाणीनागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे.

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे.दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडल्याने तेथील नागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे. धरण कोरडे होईपर्यंत तेथील मुख्याधिकाऱ्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांनी मनमाडसाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार करंजवणमधून वाघदर्डीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु धरणात पाणी पोहोचण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर करण्यात आले आहेत.जिल्ह्णात नांदगाव तालुक्यात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. जिल्ह्णात सर्वाधिक टॅँकर्स याच तालुक्यात सुरू असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातही मनमाडची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे मनमाडसाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी खासदार भारती पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार टॅँकर्स सुरू करण्यात येणार आहेत. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाडकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वास्तविक धरण कोरडे झाल्यानंतर करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी घेणे गरजेचे होते ते अगोदरच घेण्याचे नियोजन मुख्याधिकाºयांनी करून जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत जिल्हा पातळीवर काहीही नियोजन नसल्याकडे खासदार भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.येत्या २ जून रोजी करंजवणचे पाणी पालखेडमध्ये आणि तेथून ते वाघदर्डी धरणात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सुमारे ४९० एमसीएफटी पाणी वाघदर्डीत पोहोचणार आहे. त्यामुळे मनमाडकरांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी २० टॅँकर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत.