शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:08 IST

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवागदर्डीत २ जूनला पोहोचणार पाणीनागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे.

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे.दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडल्याने तेथील नागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे. धरण कोरडे होईपर्यंत तेथील मुख्याधिकाऱ्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांनी मनमाडसाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार करंजवणमधून वाघदर्डीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु धरणात पाणी पोहोचण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर करण्यात आले आहेत.जिल्ह्णात नांदगाव तालुक्यात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. जिल्ह्णात सर्वाधिक टॅँकर्स याच तालुक्यात सुरू असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातही मनमाडची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे मनमाडसाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी खासदार भारती पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार टॅँकर्स सुरू करण्यात येणार आहेत. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाडकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वास्तविक धरण कोरडे झाल्यानंतर करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी घेणे गरजेचे होते ते अगोदरच घेण्याचे नियोजन मुख्याधिकाºयांनी करून जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत जिल्हा पातळीवर काहीही नियोजन नसल्याकडे खासदार भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.येत्या २ जून रोजी करंजवणचे पाणी पालखेडमध्ये आणि तेथून ते वाघदर्डी धरणात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सुमारे ४९० एमसीएफटी पाणी वाघदर्डीत पोहोचणार आहे. त्यामुळे मनमाडकरांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी २० टॅँकर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत.