शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के थकीत वीजबिल भरल्यास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:27 IST

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून असलेली कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरू होणार तसेच थकबाकीचे सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर  घेतलेल्या पहिल्याच जनता ...

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून असलेली कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरू होणार तसेच थकबाकीचे सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर  घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात रब्बीसह अनेक प्रकारची पिके घेण्यासाठी विजेची गरज असून, सातत्याने वीज थकबाकी असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांची वीज जोडणी तोडण्यात येत असल्याने शेतकरी संकटात आल्याची तक्रार एका ग्रामस्थाने जनता दरबारात केल्यावर त्याबाबत गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. राज्यात जवळपास २० हजार कोटींहून अधिक वीज थकबाकी आहे.  राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही वीज थकबाकी वसूल होण्यासाठी विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. ऐन हंगामात शेतकºयांची वीज जोडणी तोडण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीज बिल असलेल्या शेतकºयांसाठी ही सवलत योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ज्या शेतकºयाकडे सातत्याने वीज बिलाची थकबाकी असेल आणि त्याचे वीज कनेक्शन तोडले असेल, त्या शेतकºयाने एकूण वीज बिल थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. याबरोबरच त्या शेतकºयाच्या वीज बिलाचे दंड आणि व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच त्या शेतकºयाकडील एकूण थकबाकी चार किंवा पाच टप्प्यात भरण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात घोषणा करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जनता दरबारात सांगितले.मलजलशुद्धीकरण केंद्रे बंधनकारकनगरपंचायती, नगरपालिका व महापालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी नद्या व धरणे यांच्यात थेट प्रक्रिया केल्याशिवाय सोडू नये, यासाठी मलजल श्ुद्धीकरण केंद्रा बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व नगरपालिका, महापालिका यांना पाणी नदीत सोडण्याआधी त्यांनी मलजलशुद्धीकरण (एसटीबी)केंद्र उभारण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे.मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना : ऊर्जामंत्री नागपूर : वीजबिलांची थकबाकी असलेल्या महाराष्ट्रातील कृषिपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकºयांना पाच समान हप्त्यांत थकबाकीची मूळ रक्कम भरता येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.