शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २ लाख ४ हजार शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये साचलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये साचलेले पाणी, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिमध्ये तीव्रता कमी असली, तरी शेत-पिकांचे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले. कांदा, मका, सोयाबीन, भात, तसेच द्राक्ष पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातही पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यानुसार, शासनाला २४२ कोटींची मदत मिळावी, असा अहवाल शासनाला पाठविण्यात आला.

अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हेक्टरी दहा हजार तर व फळबागांना हेक्टरी २५ हजार मदत जाहीर केल्यानुसार, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला ११० कोटींचा हप्ता प्राप्त झाला. १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली. उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीनंतर अतिवृष्टीची मदत प्राप्त होऊ शकेल, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र, अजूनही उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळू शकलेले नाही. हे शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीतील अनिश्चितता आणि कोरोनाचे संकट अशा वातावरणात मदतही नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

--इन्फो--

मदत कधीपर्यंत मिळणार मिळणार

दिवाळीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे शासनाने जाहीर केले होते. आता दिवाळी होऊनही तीन महिने झालेले आहेत. अजूनही आम्हाला मदत मिळालेली नाही. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- निंबा किसन भामरे, शेतकरी

--इन्फो--

उर्वरित मदतीची जिल्ह्याला प्रतीक्षा

अतिवृष्टीची पहिल्या टप्प्यातील मदत प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. उर्वरित मदत अजूनही जिल्ह्याला प्राप्त झालेली नाही. शासनाकडून लवकर मदत प्राप्त होणार आहे.

- भागवत डोईफोडे

निवासी उपजिल्हाधिकारी