शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी राज्य शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रीक टन खत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:52 IST

सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.

नाशिक : सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.  हंगामात शेतकरी मका  पिकाला प्राधान्य देत असल्याने, या पिकाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. या वर्षी  २ लाख ४४ हजार ६२० हेक्टरवर मकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी  २ लाख ३७ हजार ८२६ हेक्टरवर मकाची पेेरणी करण्यात आली होती. मका पाठोपाठ  सोयाबिनचाही चांगला पेरा होत असतो. या वर्षी ८८ हजार २१४ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबिनचे बियाने बोगस निघाल्यामुळे शेसकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. nगतवर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नसल्यामुळे त्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, या वर्षी जिल्ह्यातील किती शेतकरी या हंगामात सोयाबिनची पेरणी करतील, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. जिल्ह्यातील काही भागात कापसाचाही पेरा होत असून, या वर्षी ४२ हजार ५४० हेक्टर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. nजिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पिकांना पसंती देत असल्यामुळे जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र कमी होत असून, गतवर्षी १९५९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. या वर्षी ज्वारीसाठी केवळ ८७२ हेक्टर क्षत्र गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बळीराजावर चिंतेचे सावट कायम आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती