शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

खरीप हंगामासाठी राज्य शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रीक टन खत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:52 IST

सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.

नाशिक : सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.  हंगामात शेतकरी मका  पिकाला प्राधान्य देत असल्याने, या पिकाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. या वर्षी  २ लाख ४४ हजार ६२० हेक्टरवर मकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी  २ लाख ३७ हजार ८२६ हेक्टरवर मकाची पेेरणी करण्यात आली होती. मका पाठोपाठ  सोयाबिनचाही चांगला पेरा होत असतो. या वर्षी ८८ हजार २१४ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबिनचे बियाने बोगस निघाल्यामुळे शेसकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. nगतवर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नसल्यामुळे त्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, या वर्षी जिल्ह्यातील किती शेतकरी या हंगामात सोयाबिनची पेरणी करतील, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. जिल्ह्यातील काही भागात कापसाचाही पेरा होत असून, या वर्षी ४२ हजार ५४० हेक्टर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. nजिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पिकांना पसंती देत असल्यामुळे जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र कमी होत असून, गतवर्षी १९५९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. या वर्षी ज्वारीसाठी केवळ ८७२ हेक्टर क्षत्र गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बळीराजावर चिंतेचे सावट कायम आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती