शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:07 IST

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : एप्रिल ते जूनपर्यंतचाच कालावधी

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.येत्या एप्रिल आणि जून या आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत असल्याने निवडणूक शाखेच्या वतीने लागलीच निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून, अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. कळवण तालुक्यातील २९, इगतपुरी तालुक्यातील ४, येवला तालुक्यातील २५, तर दिंडोरी तालुक्यातील ४४ या ग्रामपंचायातींची मुदत काही महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने निवडणूक शाखेने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मतदारांची प्रारूप मतदारयादी, दि. १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जाहीर करण्यात येणाºया प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. आलेल्या हरकती निकालात काढल्यानंतर येत्या २४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान, महाआघाडी सरकारने गत सरकारचा निर्णय बदलला असून, जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधूनच सरपंच निवडीची घोषणा केल्यामुळे यंदाची निवडणूक ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाचे प्राबल्य त्याच पक्षाचा सरपंच हे समीकरण जुळवून येणार असल्यामुळे सरपंचांनादेखील प्रत्यक्षात काम करण्यासाठी सदस्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे.ग्रामपंचायतीची मुदत संपण्यात अवघे काही महिनेच शिल्लक असल्यामुळे गावागावात राजकीय समीकरणांची चर्चा होऊ लागली आहे. बदलेल्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणदेखील ढवळून निघाले असल्याने जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक समीकरणे बघावयास मिळण्यासाठी शक्यता आहे. राजकीय भूमिकापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारणाला महत्त्व असल्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत