शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:07 IST

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : एप्रिल ते जूनपर्यंतचाच कालावधी

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.येत्या एप्रिल आणि जून या आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत असल्याने निवडणूक शाखेच्या वतीने लागलीच निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून, अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. कळवण तालुक्यातील २९, इगतपुरी तालुक्यातील ४, येवला तालुक्यातील २५, तर दिंडोरी तालुक्यातील ४४ या ग्रामपंचायातींची मुदत काही महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने निवडणूक शाखेने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मतदारांची प्रारूप मतदारयादी, दि. १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जाहीर करण्यात येणाºया प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. आलेल्या हरकती निकालात काढल्यानंतर येत्या २४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान, महाआघाडी सरकारने गत सरकारचा निर्णय बदलला असून, जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधूनच सरपंच निवडीची घोषणा केल्यामुळे यंदाची निवडणूक ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाचे प्राबल्य त्याच पक्षाचा सरपंच हे समीकरण जुळवून येणार असल्यामुळे सरपंचांनादेखील प्रत्यक्षात काम करण्यासाठी सदस्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे.ग्रामपंचायतीची मुदत संपण्यात अवघे काही महिनेच शिल्लक असल्यामुळे गावागावात राजकीय समीकरणांची चर्चा होऊ लागली आहे. बदलेल्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणदेखील ढवळून निघाले असल्याने जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक समीकरणे बघावयास मिळण्यासाठी शक्यता आहे. राजकीय भूमिकापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारणाला महत्त्व असल्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत