शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:07 IST

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : एप्रिल ते जूनपर्यंतचाच कालावधी

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या २४ तारखेपासून अंतिम मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.येत्या एप्रिल आणि जून या आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत असल्याने निवडणूक शाखेच्या वतीने लागलीच निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून, अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. कळवण तालुक्यातील २९, इगतपुरी तालुक्यातील ४, येवला तालुक्यातील २५, तर दिंडोरी तालुक्यातील ४४ या ग्रामपंचायातींची मुदत काही महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने निवडणूक शाखेने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मतदारांची प्रारूप मतदारयादी, दि. १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जाहीर करण्यात येणाºया प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. आलेल्या हरकती निकालात काढल्यानंतर येत्या २४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान, महाआघाडी सरकारने गत सरकारचा निर्णय बदलला असून, जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधूनच सरपंच निवडीची घोषणा केल्यामुळे यंदाची निवडणूक ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाचे प्राबल्य त्याच पक्षाचा सरपंच हे समीकरण जुळवून येणार असल्यामुळे सरपंचांनादेखील प्रत्यक्षात काम करण्यासाठी सदस्यांचे सहकार्य मिळू शकणार आहे.ग्रामपंचायतीची मुदत संपण्यात अवघे काही महिनेच शिल्लक असल्यामुळे गावागावात राजकीय समीकरणांची चर्चा होऊ लागली आहे. बदलेल्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणदेखील ढवळून निघाले असल्याने जिल्ह्णातील काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक समीकरणे बघावयास मिळण्यासाठी शक्यता आहे. राजकीय भूमिकापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारणाला महत्त्व असल्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत