शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाणी योजनांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची धग जाणवत असते. यंदा तालुक्यातील वेळुंजे, हेदपाडा, सोमनाथनगर, वेळे, मुरंबी, नांदगाव, कोहळी, तोरंगण, ...

तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची धग जाणवत असते. यंदा तालुक्यातील वेळुंजे, हेदपाडा, सोमनाथनगर, वेळे, मुरंबी, नांदगाव, कोहळी, तोरंगण, खैरायपाली या गावांचे टंचाई प्रस्ताव पाठवण्यात आले होते. सध्या तीन खासगी टँकरने तीन गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसात कोणत्याही नवीन गावाचा टंचाईचा प्रस्ताव आलेला नाही. मात्र, तालुक्यातील हरसूल परिसरातील मुरंबी, शिरसगाव, मुरंबी, कोटंबी या गावांसह हरसूलच्या पश्चिम पट्ट्यातील खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा आदी गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवत असते. गेल्या ५-६ दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असले तरी उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करत सुमारे १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत ही कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो

प्रस्तावित कामे व निधी

१) गणेशगाव येथे नळपाणी पुरवठा योजना - १५.८९ लक्ष रुपये

२) ब्राह्मणवाडे पाणी योजना - १५.९० लक्ष रुपये

३) नांदगाव कोहळी पाणी योजना - १५.५८ लक्ष रुपये

४) गणेशगाव ( वा) गोरठाण - १६ लक्ष रुपये

५) पेगलवाडी पाणी योजना - १६.६१ लक्ष रुपये

६) गंगाम्हळुंगी (शास्त्रीनगर) - १५.४८ लक्ष रुपये

७) वेळे (होलदार नगर) पाणी योजना - १७.५०लक्ष रुपये

कोट....

पाणी योजनेची ही सर्व कामे नवीन असून निधीदेखील मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. पाणी योजनांबरोबरच रस्ते, घरकुले, शाळा व अंगणवाड्यांच्या इमारती आदी कामांसाठीही निधी आणला जात आहे. इगतपुरी त्र्यंबकचा समतोल सर्वांगीण विकास केला जाईल.

- हिरामण खोसकर, आमदार

फोटो- ३० त्र्यंबक वॉटर-१

===Photopath===

300521\30nsk_12_30052021_13.jpg

===Caption===

फोटो- ३० त्र्यंबक वॉटर-१