शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शिक्षणसंस्थेच्या १८ जागांसाठी ३६ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:38 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व परिवर्तन पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.

 

लोकशिक्षण मंडळ : परिवर्तन-संस्थापक पॅनलमध्ये लढत; प्रथमच निवडणूक होत असल्याने चुरस

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व परिवर्तन पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.अध्यक्षपदासह चार पदाधिकारी, तीन विश्वस्त व ११ संचालक अशा एकूण १८ जागांसाठी येत्या १८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. संस्थेत एकूण १३६६ सभासद मतदारसंख्या आहे. संस्थेच्या व्ही.पी. नाईक हायस्कूल, नांदूरशिंगोटे व भोजापूर खोरे हायस्कूल, चास अशा दोन शाखा आहे. १८ जागांसाठी ११४ अर्ज दाखल झाले होते. त्यात ७८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३६ उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपाद जोशी, सदस्य गोपाळ शेळके, जगन्नाथ खैरनार यांनी दिली.अध्यक्षपदासाठी जयसिंह सुदाम सांगळे व संदीप शिवाजी भाबड, उपाध्यक्ष पदासाठी बंडूनाना दामोधर भाबड व प्रशांत सुभाष सानप, सरचिटणीस पदासाठी कृष्णा विलास सानप व बी. टी. शेळके, सहचिटणीस पदासाठी संजय दगडू शेळके व पोपट दामोधर शेळके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे, तर विश्वस्तपदाच्या तीन जागांसाठी ६ उमेदवारांमध्ये थेट सामना आहे. केरू रामजी भाबड, शिवाजी बबन दराडे, मारुती कारभारी दराडे यांच्यात सरळ लढत होत आहे.संचालकपदाच्या नांदूरशिंगोटे गटाच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सुधाकर कारभारी शेळके, नागेश शिवनाथ शेळके, दत्तात्रय वेडू सानप, अरुण भाऊपाटील शेळके, सुनील काशीनाथ मुंढे, रंजना उत्तम इलग, नामदेव लक्ष्मण गर्जे, चंद्रकांत मारुती शेळके यांच्यात समोरासमोर सामना रंगणार आहे. संचालकपदाच्या चास गटाच्या चार जागांसाठी परशराम तुकाराम भाबड, तुकाराम महादू भाबड, दिलीप राधाकिसन खैरनार, चंद्रभान कारभारी दराडे, शरद एकनाथ दराडे, जगन्नाथ गंगाधर खैरनार, सुनील जगन्नाथ भाबड यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. लोकशिक्षण मंडळ ही शैक्षणिक संस्था स्थापन झाल्यानंतर गेल्या ५५ वर्षांच्या काळात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबविली जात असल्याने सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वीस वर्षांपूर्वी संस्थेत नांदूरशिंगोटे व भोजापूर परिसरातील आणि उर्वरित तालुक्यातून सभासद नोंदणी झाली होती. त्यानंतर प्रथमच सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.विरोधी गटांकडून परिवर्तन, तर सत्ताधारी गटाकडून संस्थापक पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथमच निवडणूक होत असल्यानेअध्यक्ष व सरचिटणीस पदासाठी मोठ्या प्रमाणात चुरस पहायला मिळणार आहे.