शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

निवडणुकीसाठी ५०० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:25 IST

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक शाखा : ‘जीपीएस’प्रणाली असणाऱ्या बसेस घेणार

नाशिक : मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी ४,५७९ इतकी मतदान केंद्रे असून, त्यामध्ये १३३ साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६५ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक होणार असल्याने यासाठी ईव्हीएमची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन्स आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहतूक केली जाणार आहे. निवडणूक शाखेकडून मतदारसंघनिहाय बसेसचे नियोजन करून त्यानुसार ५२० बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत.निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील १३ डेपोंमधून या बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार नाशिक पूर्वसाठी ३०, मध्य नाशिकसाठी १८, नाशिक पश्चिमसाठी ५७, देवळाली ३७, मालेगाव मध्य १९, मालेगाव बाह्य ३७, बागलाण २१, कळवण ४०, चांदवड ३८, नांदगाव ४२, येवला ४१, सिन्नर ४४, निफाड ३६, इगतपुरी २७, तर दिंडोरी २६ याप्रमाणे बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.निवडणुकीसाठी विविध खात्यांमधील सुमारे ३० हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागणार आहे, तर कर्मचारी आणि मतदान केंद्रांची संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देण्यात आले आहे. शक्यतो आदिवासी दुर्गम भागात बसेसचा उपयोग प्राधान्याने करावा लागणार आहे. या वाहनांबरोबरच पोलीस बंदोबस्तातील काही खासगी वाहनांचादेखील प्रसंगी समावेश केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक शाखेने मागणी केलेल्या बसेसपेक्षा काही बसेस अतिरिक्त ठेवण्यात येणार आहेत. तातडीची गरज म्हणून या बसेस तैनात केल्या जाणार आहेत. चालकांना या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या असून, निवडणुकीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी चालकांना सुटी घेऊ नये, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.चालकांना मतदानाला देणार प्राधान्यमतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन्स घेऊन जाण्यासाठी लागणाºया बसेसचे जे चालक आहेत त्यांना बसेस घेऊन जाण्यापूर्वी आपापल्या मतदारसंघात मतदान करून घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबतच्या सूचना निवडणूक शाखेकडून दिल्या जाणार आहेत.४जिल्हाभरातील चालक या बसेससाठी लागणार आहेत. त्यामुळे या चालकांना लवकरात लवकर कसे मतदान करून घेता येईल यासाठी महामंडळाच्या अधिकाºयांनीदेखील चालकांना सूचना देण्याचे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक