शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शहरात अकरावीच्या १९ हजार जागा

By admin | Updated: June 7, 2014 01:36 IST

नाशिक : इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल या महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून माध्यमिक विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे.

नाशिक : इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल या महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून माध्यमिक विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. शहरातील सुमारे ४६ महाविद्यालयांमध्ये १९,७२० इतकी प्रवेश क्षमता असल्याने प्रवेशापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्राचार्यांच्या सहविचार सभेत प्रवेशाचे नियोजन केले जाणार आहे.अकरावी प्रवेशाचे नियोजन करण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने येत्या १३ रोजी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत शहर तसेच जिल्ह्यातील इयत्ता अकरावी प्रवेशाचे नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या आणि अकरावीत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता तफावत दिसत असली, तरी प्रत्यक्षात अकरावीचे विद्यार्थी पॉलिटेक्निक, आयटीआय तसेच इतर अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याने अकरावी प्रवेशाची कोणतीही अडचण होणार नाही, असा दावा माध्यमिक विभागाने केला आहे. शहरातील ४६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १९,७२० इतकी प्रवेश क्षमता असून, त्यामध्ये ४६४० कला शाखा, ७२८० विज्ञान शाखा, ७३२० वाणिज्य शाखा आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाच्या ४८० जागा आहेत. यंदा अनेक नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यामुळे अकरावीची प्रवेश क्षमता वाढलेली आहे. यंदादेखील प्रवेशप्रक्रिया कशी राबविली जाईल याविषयीची उत्सुकता असून, केटीएचएम महाविद्यालयात मात्र यंदापासून संपूर्ण प्रक्रिया ही आॅनलाइन राबविली जाण्याची शक्यता आहे. इतर महाविद्यालयांमध्ये नेहमीप्रमाणे केवळ संगणकावर अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरच प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. (प्रतिनिधी)