शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नमामि गोदेसाठी केंद्राकडून १८०० कोटींचे पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 01:17 IST

सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने हा निधी द्यावा यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यांना साकडे घातले. यासंदर्भात महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही शेखावत यांनी दिले आहेत, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची मान्यता: भाजप शिष्टमंडळाने पंतप्रधानांनाही घातले साकडे

नाशिक - सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने हा निधी द्यावा यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यांना साकडे घातले. यासंदर्भात महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही शेखावत यांनी दिले आहेत, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

केंद्र शासनाने नाशिककरांंना दिलेली ही मोठी भेट असून त्यामुळे गोदावरी नदीचे नष्टचर्य संपण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रियाही महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यामुळेच आता भाजपने लोकांना दिसतील अशाप्रकारची कामे करण्यावर, किमान जाहीर करण्यावर भर दिला आहे. गोदावरी नदीसाठी अशा प्रकारचा १८ काेटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी महापालिकेने २०२० मध्येच प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळावी यासाठी यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पूर्वीच पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपचे शिष्टमंडळच दिल्लीदरबारी गेले आहे. मंगळवारी त्यांनी जलमंत्री शेखावत यांची भेट घेतली.

महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे व संजय घुगे यांनी या प्रकल्पाचे जलमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. तसेच नाशिक ही कुंभनगरी असून दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. देश-विदेशातून भाविक या नगरीत येत असतात. त्यामुळे गोदावरीचे जल शुध्द असले पाहिजे, यासाठी नाशिक महापालिकेने योजना आखली आहे, त्यानुसार नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी शुध्दीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी महापौर कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी केली. शेखावत यांनी त्यास तत्त्वत: मान्यता देतानाच येत्या २-३ दिवसात राज्याचे मुख्यमंत्री, नाशिकचे महापौर, तसेच आयुक्तांना देखील पत्र पाठविण्यात येईल, असे शेखावत यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते कमलेश बोडके, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक जगदीश पाटील, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

इन्फो...

राजनीती नव्हे, महापौरांची जलनेती

निवडणुकीच्या तोंडावर करून दाखवले, असे दाखवण्यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीला गेल्यानंतर भाजपाच्या राजनीतीची चर्चा सुरू असली तरी, महापौरांनी मात्र जलनेती केली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय जलमंत्री शेखावत यांच्या भेटीनंतर भाजप शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आणि नमामि गोदा प्रकल्पाविषयी महापौरांनी पंतप्रधानांना माहिती दिली. यावेळी देखील महापौरांनी 'जलनेती' पुस्तिका भेट म्हणून दिली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार देखील उपस्थित हेात्या.

----

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNarendra Modiनरेंद्र मोदीMayorमहापौरgodavariगोदावरी