शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर

By अझहर शेख | Updated: July 25, 2023 14:24 IST

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

नाशिक : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. यानंतर राज्यातील दरडक्षेत्रांत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत डोंगरावर वसलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील पाच पाड्यांवरील १७७ कुटुंबांचे लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळल्याने शंभरापेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दरड क्षेत्रांतील जिल्ह्यांना ‘अलर्ट’ जारी करत तातडीने अशा धोकादायक व डोंगररांगांमध्ये अथवा पायथ्याशी वसलेल्या वाडी, वस्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील राखीव वनाच्या हद्दीतील मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाच आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सोमवारी (दि.२४) बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, इगतपुरी-त्र्यंबकचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी किसन खताळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार आदी वन, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.

मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत असलेल्या सुपलीची मेट, गंगाद्वार या दोन पाड्यांचे मिळून एकत्रित गावठाण यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहे. यानुसार सध्या असलेल्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर त्याच भागात या दोन पाड्यांवरील १३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पठारवाडी, जांभुळपाडा, विनयखिंड या तीन पाड्यांची मिळून एकूण ४२ कुटुंबे आहेत. त्यांचे एकत्रित गावठाण मंजूर करण्यात येणार असून महसूलकडून तहसीलदार संचेती यांनी या गावातील कुटुंबांना स्थलांतरित होण्यासाठी सुरक्षित जागा सुचविली असून गावठाण मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे बैठकीत सांगण्यात आले. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पाचही पाड्यांवरील गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पाड्यांचा होतो समावेश

सुपलीची मेट, गंगाद्वार, विनयखिंड, महादरवाजा, पठारवाडी हे पाच आदिवासी पाडे मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतात. हे सर्व पाडे ब्रह्मगिरी डोंगरावर वसलेले आहेत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न मागील २०१८ सालापासून केला जात आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक