शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर

By अझहर शेख | Updated: July 25, 2023 14:24 IST

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

नाशिक : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. यानंतर राज्यातील दरडक्षेत्रांत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत डोंगरावर वसलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील पाच पाड्यांवरील १७७ कुटुंबांचे लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळल्याने शंभरापेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दरड क्षेत्रांतील जिल्ह्यांना ‘अलर्ट’ जारी करत तातडीने अशा धोकादायक व डोंगररांगांमध्ये अथवा पायथ्याशी वसलेल्या वाडी, वस्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील राखीव वनाच्या हद्दीतील मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाच आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सोमवारी (दि.२४) बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, इगतपुरी-त्र्यंबकचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी किसन खताळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार आदी वन, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.

मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत असलेल्या सुपलीची मेट, गंगाद्वार या दोन पाड्यांचे मिळून एकत्रित गावठाण यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहे. यानुसार सध्या असलेल्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर त्याच भागात या दोन पाड्यांवरील १३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पठारवाडी, जांभुळपाडा, विनयखिंड या तीन पाड्यांची मिळून एकूण ४२ कुटुंबे आहेत. त्यांचे एकत्रित गावठाण मंजूर करण्यात येणार असून महसूलकडून तहसीलदार संचेती यांनी या गावातील कुटुंबांना स्थलांतरित होण्यासाठी सुरक्षित जागा सुचविली असून गावठाण मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे बैठकीत सांगण्यात आले. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पाचही पाड्यांवरील गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पाड्यांचा होतो समावेश

सुपलीची मेट, गंगाद्वार, विनयखिंड, महादरवाजा, पठारवाडी हे पाच आदिवासी पाडे मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतात. हे सर्व पाडे ब्रह्मगिरी डोंगरावर वसलेले आहेत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न मागील २०१८ सालापासून केला जात आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक