शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर

By अझहर शेख | Updated: July 25, 2023 14:24 IST

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

नाशिक : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. यानंतर राज्यातील दरडक्षेत्रांत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत डोंगरावर वसलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील पाच पाड्यांवरील १७७ कुटुंबांचे लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळल्याने शंभरापेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दरड क्षेत्रांतील जिल्ह्यांना ‘अलर्ट’ जारी करत तातडीने अशा धोकादायक व डोंगररांगांमध्ये अथवा पायथ्याशी वसलेल्या वाडी, वस्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील राखीव वनाच्या हद्दीतील मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाच आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सोमवारी (दि.२४) बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, इगतपुरी-त्र्यंबकचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी किसन खताळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार आदी वन, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.

मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत असलेल्या सुपलीची मेट, गंगाद्वार या दोन पाड्यांचे मिळून एकत्रित गावठाण यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहे. यानुसार सध्या असलेल्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर त्याच भागात या दोन पाड्यांवरील १३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पठारवाडी, जांभुळपाडा, विनयखिंड या तीन पाड्यांची मिळून एकूण ४२ कुटुंबे आहेत. त्यांचे एकत्रित गावठाण मंजूर करण्यात येणार असून महसूलकडून तहसीलदार संचेती यांनी या गावातील कुटुंबांना स्थलांतरित होण्यासाठी सुरक्षित जागा सुचविली असून गावठाण मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे बैठकीत सांगण्यात आले. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पाचही पाड्यांवरील गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पाड्यांचा होतो समावेश

सुपलीची मेट, गंगाद्वार, विनयखिंड, महादरवाजा, पठारवाडी हे पाच आदिवासी पाडे मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतात. हे सर्व पाडे ब्रह्मगिरी डोंगरावर वसलेले आहेत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न मागील २०१८ सालापासून केला जात आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक