शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 01:28 IST

 पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.

नाशिक :  पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोरोनाग्रस्त असल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी मनपा कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आलेल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार !जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी चारशेपर्यंत पोहोचलेली संख्या रविवारी ६९१ पर्यंत पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्रलंबित अहवालांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली असून, ही संख्या १८९ पर्यंत कमी झाली आहे. त्यात नाशिक मनपा १४६, नाशिक ग्रामीण ३२, तर मालेगाव मनपाचे ११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात पुन्हा अल्पशी घट येऊन ते ९७.७२ टक्के झाले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ झाल्याने कोराेना उपचारार्थी संख्यादेखील सातशेनजीक अर्थात ६९१ पर्यंत पोहोचली आहे.

इन्फोसलग दुसऱ्या दिवशी शून्य बळी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य असल्याचा यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गत आडवडाभरात तीनवेळा कोरोना बळी शून्य राहिले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना काहीसा दिलासा बळींमध्ये मिळाला असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कितपत कायम राहील याबाबत साशंकताच आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या