लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, कर्जमाफी अल्पभूधारकांना व केवळ पीककर्ज घेणाऱ्यांनाच माफ होणार असल्याचे वृत्त आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून केवळ पीककर्ज घेणाऱ्या १ लाख ६५ हजार १५१ शेतकऱ्यांना सुमारे एक हजार ४५ कोटींची कर्जमाफी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे मिळणे शक्य आहे.राज्य शिखर बॅँकेने अतितत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांतील अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांची ८ अ नमुन्यात माहिती मागविली आहे. ८ अ नमुन्यानुसार असलेल्या जिंदगीपत्रकात नेमकी किती शेती आहे, क्षेत्रफळ किती, त्यावर कोणते पीक घेतले आहे यांसह अन्य बारीकसारीक बाबींचा तपशील दिलेला असतो. त्यानुसार ही माहिती अतितत्काळ मागविण्यात आली असून, सोमवारी (दि.१२) जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून जिल्हा आणि तालुका पातळीवरून माहिती गोळा करण्यात येत आहे. राज्य शिखर बॅँकेने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंतचे अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकबाकी तसेच ३० जून २०१७ अखेरपर्यंतची एकूण थकबाकी व त्यावरील व्याज याची माहिती मागविली आहे. सरसकट कर्जमाफीचा विचार केला तर मध्यम वर्गातील शेतकरी व लहान गटातील शेतकरी यांची माहिती
पुढीलप्रमाणे- पन्नास हजाराच्या आतील पीककर्ज थकबाकीदार एकूण शेतकरी संख्या ६७ हजार ५३०, एकूण रक्कम- २०४ कोटी ८३ लाख; पन्नास हजाराच्या पुढील व एक लाखाच्या आतील पीक कर्जदार शेतकरी- ६७ हजार ७६६, एकूण रक्कम ४८८ कोटी १५ लाख; एक लाख ते दीड लाखापर्यंतचे पीक कर्जदार शेतकरी- २९ हजार ८५५ शेतकरी, एकूण पीककर्ज रक्कम- ३५२ कोटी २० लाख असे एकूण १ लाख ६५ हजार १५१ शेतकरी व पीक कर्जाची रक्कम १०४५ कोटी १८ लाख इतकी आहे.मध्यम व लहान गटाच्या शेतकऱ्यांची संख्या ( पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंतची एकूण संख्या )मध्यम गट- ५४ हजार ४७३ शेतकरी एकूण पीककर्ज रक्कम- २३३ कोटी ३ लाखलहान गट- ८७ हजार १३७ शेतकरी एकूण पीककर्ज रक्कम ५९७ कोटी ३१ लाखबहुधारक शेतकरी- २३ हजार ५४१ शेतकरी- एकूण पीककर्ज रक्कम २१४ कोटी ५३ लाख