शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

By admin | Updated: May 10, 2014 00:08 IST

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापननाशिक : खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५अशा एकूण १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी खास जिल्हा परिषदेत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.भरारी पथकांमध्ये प्रत्येकी पाच अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, तर सदस्य सचिव म्हणून मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. वाय. साळुंखे व सहाय्यक निरीक्षक वजन व मापे डी.पी. पवार यांचा समावेश आहे. पंधरा तालुक्यांसाठी १५ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यात तालुका भरारी पथकाच्या अध्यक्षपदी संबंधित तालुका कृषी अधिकार्‍यांची तर सदस्य सचिव म्हणून कृषी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भरारी पथके खरीप व रब्बी हंगामासाठी कार्यरत असतील. त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी यांची निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रार निवारण कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे व कृषी विस्तार अधिकारी व्ही. पी. केदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा तक्रार निवारण कक्ष सुटीचे दिवस वगळून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यरत राहणार असून, या कालावधीत आलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम या अधिकार्‍यांना करावयाचे आहे.(प्रतिनिधी)