शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कहांडळवाडीचे १५३ लाभार्थी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:02 IST

सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत केंद्राच्या संकेतस्थळावर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) ग्रामपंचायतीचा समावेश होत नसल्याने १५३ लाभार्थींचे सुमारे १८ लाखांचे शौचालयांचे अनुदान अडकून पडले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे पाठपुरावा करूनही शासनाच्या संकेतस्थळावर होईना समावेश

सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत केंद्राच्या संकेतस्थळावर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) ग्रामपंचायतीचा समावेश होत नसल्याने १५३ लाभार्थींचे सुमारे १८ लाखांचे शौचालयांचे अनुदान अडकून पडले आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर शिवाजीनगरचा समावेश करण्यासाठी शासन दरबारी गेल्या ५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्याला यश येत नसल्याने सरकारचे प्रतिनिधीच हगणदारीमुक्त गाव योजनेच्या यशात अडथळे निर्माण करत असल्याचे समोर आले आहे.संगणक क्षेत्रात कमालीची क्र ांती झालेली असताना केवळ गावाचे नाव शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यासाठी पाच वर्षे उलटूनही यश येत नसल्याने डिजिटल इंडियाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत हगणदारीमुक्त गाव योजना गावोगावी राबवली जात आहे. त्यासाठी ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी प्रत्येकी १२ हजार रु पयांचे अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. तालुक्यातील कहांडळवाडी ग्रामपंचायतीच्या २०१२ च्या स्वच्छ भारत मिशन सर्वेक्षणांतर्गत २०१ कुटुंबांपैकी केवळ ४८ कुटुंबांकडे शौचालय असल्याचे दिसून आल्यानंतर १५३ कुटुंब शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पात्र होते. त्यासाठी केंद्र शासनाकडून त्यांना पंचायत समितीमार्फत प्रत्येकी १२ हजार रु पये अनुदान मिळणे अपेक्षित होते.मात्र या गावाचा केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर समावेश नसल्याने येथील लाभार्थींना अनुदान देण्यात पंचायत समितीने असमर्थता दर्शविली. गाव पातळीवरून वारंवार पंचायत समितीकडे पाठपुरावा केल्यानंतर समितीनेही कहांडळवाडीचे नाव स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्राच्या संकेतस्थळावर येण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.मंत्रालय स्तरावर हा विषय जाऊनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गाव हगणदारीमुक्त न होण्यास शासनाची दिरंगाईच कारणीभूत असल्याचा आरोप सरपंच अण्णासाहेब कहांडळ यांनी केला आहे.२२ जून २०१८ पासून सुरू असलेला हा कागदी घोडे नाचवण्याचा सिलसिला गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. २९ डिसेंबर २०१७, ११ मे २०१८ आणि त्यानंतर ६ जून २०१९ अशी सातत्याने स्मरणपत्रे राज्य शासनाकडे पाठवूनही अद्याप या गावाचा केंद्र शासनाच्या आॅनलाइन संकेतस्थळावर समावेश करण्यात आलेला नाही. परिणामी गावातील १५३ लाभार्थी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार