शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब; गुजरात पोलिसांकडूनही ‘एस्कॉर्ट'

By अझहर शेख | Updated: May 29, 2023 19:29 IST

दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले.

नाशिक : दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. तेथे मुक्काम केल्यानंतर रायकांनी उंटांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) राजस्थानच्यादिशेने प्रवास सुरू केला. सोमवारी (दि.२९) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी शहर ओलांडल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली. अबुरोडने हे उंट मरूभुमी सिरोही गाठणार आहे. यासाठी अजून दहा ते बारा दिवसांचा प्रवास करत सुमारे ५००किमीचे अंतर कापावे लागणार असल्याचे रायकांनी सांगितले.

दहा दिवसांपुर्वी शुक्रवारी (दि.१९) निघालेले ९५ उंट आणि रविवारी मालेगावातून निघालेले ५३ उंट धरमपूरमध्ये पोहचले. तेथे दोन दिवसांचा मुक्काम केला. दरम्यान, सिडकोच्या मंगलरूप गोशाळेत असलेले तीन उंटांनाही शुक्रवारी ट्रकमधून धरमपूरला पोहचविण्यात आले. त्यानंतर उंटांनी पुढे प्रवास आरंभ केला. सुमारे १५०उंटांचा हा कळप गुजरात राज्यातून सध्या मार्गस्थ होत आहे. यासाठी वलसाड जिल्हा पोलिसांसह सुरत व पुढे मांडवी आणि जुनागढ जिल्ह्यातील जमखा पोलिसांकडून बंदोबस्त देण्यात येत आहे. गुजरात राज्यातील कच्छ, जुनागढ, नर्मदा, वडोदरा, अहमदाबाद पोलिसांकडून दंतेवाडा आमिरगडपर्यंत उंटांना ‘एस्कॉर्ट’ केले जाणार आहे. आमिरगडपासून पुढे राजस्थान पोलिसांकडून बंदोबस्त पुरविला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

...असे गाठणार सिरोही!मांडवी-जमखा-राजपिपला, वडोदरा, अहमदाबाद, बनासकाठा, दंतेवाडा, अमिरगड, अबुरोड, स्वरुपगंज, पिंडवाडामार्गे दक्षिण राजस्थानातील सिरोहीमध्ये दाखल होणार आहे. सुमारे ५००किमीचे हे अंतर कापण्यासाठी अजुन दहा ते बारा दिवसांचा पायी प्रवास उंटांना करावा लागणार आहे. महाविर कॅमल सेन्च्युरीद्वारे या उंटांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक