शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

१५ टक्केच भाजीपाला मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:06 IST

मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे.

पंचवटी : मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे. मुंबईत पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी होणाºया लिलावावर झाला. मुंबईभर पाणी साचल्याने भाजीपाला पोहोचणे शक्य नसल्याने जवळपास सर्वच पालेभाज्यांचे बाजारभाव पन्नास टक्क्यांनी घसरले. नाशिक बाजार समितीतून दैनंदिन पन्नास चारचाकी वाहने भरून पालेभाज्या माल मुंबई, ठाणे, कल्याण बाजारात जातो. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने केवळ १० ते १५ वाहने भरून सायंकाळी पालेभाज्या माल रवाना झाला आहे. सायंकाळी घोटीपासून पुढे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविली होती. पावसाचा जोर ओसरला तरच मुंबईकडे भाजीपाला वाहने पोहचतील अन्यथा सर्वच पालेभाज्या माल अन्य बाजारात पाठवावा लागण्याची शक्यता आहे.मुंबई व उपनगरांत सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे. नाशिक बाजार समितीतून पाठविलेला शेतमाल वेळेवर पोहोचेल याची शाश्वती नाही. बाजार समितीतून केवळ दहा ते बारा चारचाकी वाहने पालेभाज्या माल मुंबईत रवाना केला असला तरी तो माल व्यापारी व खरेदीदार यांच्या जबाबदारीवर पाठविला आहे. पालेभाज्या माल सहसा ठाणे तसेच कल्याणपर्यंत जाईल, असे दिसते.- अरुण काळे, सचिव, कृउबा, नाशिक