शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तीन महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:58 IST

दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली.

नाशिक : दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने या वातावरणातही एच वन, एन वनचे विषाणू कार्यरत होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिकरीत्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देकाटे यांनी सांगितले की, दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. या परिस्थितीमध्ये एच वन, एन वन (स्वाइन फ्लू) या आजाराची रु ग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता असते.आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागांमधून एच वन, एन वनसदृश १४७ रु ग्ण आढळून आलेले आहेत व आजपर्यंत १४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर रु ग्णाचे प्रमाण हे शहरी भागांमध्ये जास्त आढळून येत असल्याने स्वत:ची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. ताप, सर्दी, घसादुखी, पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घेणे गरजेचे असल्याचे देकाटे यांनी सांगितले. आजारी व्यक्तीने गर्दीमध्ये मिसळू नये तसेच सर्दी-पडसेची लक्षणे आढळून आल्यास शिंकताना खोकताना रु मालाचा वापर नियमितपणे करावा तसेच आहार चांगल्या पद्धतीने घेण्यात यावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आराम करावा, लहान मुलांना उबदार कपड्यांमध्ये ठेवावे त्यांना वेळीच दवाखान्यात दाखवून उपचार करून घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.काळजी घेण्याचे आवाहनया आजारावरील औषधे टॉमी फ्लू सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रु ग्णालय येथे उपलब्ध असून संशय वाटल्यास त्वरित संबंधित आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावे, सामाजिक समारंभ, जत्रा, शाळा, वसतिगृहे या ठिकाणी हे आजार वेगाने पसरतात त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची लक्षणे अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूNashikनाशिक