शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आरटीईच्या ४,५४४ जागांसाठी १३ हजार ३२७ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले ...

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. आरटीई प्रवेशप्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून, शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६, तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे १३ हजार ३२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे.

पॉईंटर

नोंदणीकृत शा‌ळा -४५०

उपलब्ध जागा - ४५४४

प्राप्त अर्ज १३३२७

इन्फो-

आता लक्ष लॉटरीकडे

आरीटी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतीक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे.

इन्फो

अशी आहेत आव‌श्यक कागदपत्र

आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरील पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही.

कोट -१

आरटीई प्रवेशामुळे मुलांना चांगल्या शा‌ळेत शिकविण्यासाठी आधार मिळतो. किमान शैक्षणिक शुल्क माफ झाले तरी इतर खर्च मोलमजुरी करून भागवता येतो. मात्र लॉटरीत नंबर लागला नाही तर चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाचे सामान्य विद्यार्थी स्वप्नही पाहू शकत नाही.

- संदीप कोकणे, पालक

कोट -

मोठ्या शाळांमध्ये मोठ्या रकमांचे शुल्क आकारले जात असले तरी आरटीईमुळे गरिबांच्या मुलांनाही चांगल्या दर्जाचे मोफत शिक्षण मिळते. तसेच घराच्या परिसरातच शाळा मिळत असल्याने बसचा खर्चही येत नाही. पण सोडतीत प्रवेशाची संधी मिळाली नाही, आर्थिक दुर्बल घटकातील पालक अशा शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा विचारही करू शकत नाही.

- कृष्णा पवार, पालक

कोट -१

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. आता लॉटरी कधी निघणार याकडे लक्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वेळेत प्रवेश प्रक्रिया झाली नाही, तर आरटीई अंतर्गतही प्रवेश मिळत नाही. तसेच जवळपासच्या अनुदानित शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याने मुलांच्या प्रवेशासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे आरटीई प्रवेश वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.

विलास जाधव, पालक

इन्फो-

आरटीई प्रवेशप्रक्रियेत जिल्हास्तरावर ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी तब्बल १३ हजार २२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यात मनपा क्षेत्रातील ९१ शाळांमधील १५४६ जागांचा समावेश असला तरी अद्याप तालुकानिहाय उपलब्ध जागांसाठी किती विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. याविषयी शिक्षण विभागाकडे कोणतीही माहिती नाही. प्रामुख्याने शहरातील विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा करूनही संधी मिळत नसताना ग्रामीण भागात मात्र अनेकदा जागा रिक्त राहत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.