शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

त्र्यंबकेश्वर तालुक्यात १३ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर समजले जाणारे त्र्यंबकेश्वर तालुका या वर्षी अजूनही तहानलेला आहे. दरवर्षी एरव्ही तालुक्याची पेरणी आटोपलेली असते. ...

त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर समजले जाणारे त्र्यंबकेश्वर तालुका या वर्षी अजूनही तहानलेला आहे. दरवर्षी एरव्ही तालुक्याची पेरणी आटोपलेली असते. मात्र, यंदा जुलैचा पंधरवडा उलटला, तरी तालुक्यात अवघ्या १३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. पिके जगविण्यासाठी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र २५२६६.२ हेक्टर असून, त्यापैकी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ६३४ हेक्टर आहे. त्यापैकी पेरणी अवघी १,५९६ हेक्टर एवढीच झाली आहे. नागलीची पेरणी ५,३९४ हेक्टरपैकी अवघी ७२ हेक्टर झाली आहे. वरई ३,२४१ हेक्टरपैकी २६ हेक्टरवर, तर तूर ७२३.४ हेक्टर पैकी ४४० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान, एकूण तृणधान्य २०,२९६ पैकी २,३४९ हेक्टर, एकूण कडधान्य २,९०८ हेक्टर क्षेत्रापैकी ६५५ हेक्टर तर एकूण तेलबिया २,०६१ हेक्टर क्षेत्रापैकी ८४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. आजवर एकूण २५,२६६ हेक्टर क्षेत्रापैकी ३,१९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस पडत असला, तरी नजीकच्या काळात दमदार व जास्त पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने भात रोपवाटिकांचा पर्याय खुला ठेवला असला, तरी पुनर्लागवड (आवणी) करण्यासाठी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे. या वर्षी तालु्क्यात ३२५ मिमी पावसाची सरासरी आहे. पाऊस मात्र रिमझिम पडत असल्याने पुनर्लागवड (आवणी) करता येत नाही. ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही, पण त्र्यंबकेश्वर शहरात मात्र दिवसाआड नगरपरिषदेकडून पाणी सोडले जात आहे. ऐन पावसाळ्यात त्र्यंबककरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.