शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील बारा टोलनाके बंद करणार? बांधकाम खात्याची शिफारस : धोरण बदलणार

By admin | Updated: May 28, 2014 01:39 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने आता जनहिताचा विचार करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या टोलधाडीमुळे मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी ३३ टोलनाके बंद करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याने केली आहे, त्यात नाशिक जिल्‘ातील १२ टोलनाक्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने आता जनहिताचा विचार करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या टोलधाडीमुळे मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी ३३ टोलनाके बंद करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याने केली आहे, त्यात नाशिक जिल्‘ातील १२ टोलनाक्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या कारणांमुळे फटका बसला त्यात राज्यात ठिकठिकाणी आकारल्या जाणार्‍या टोलचाही समावेश असल्याचे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ठाम मत झाले आहे. त्यातून टोलधाडीतून वाहनधारकांना मुक्त करण्यासाठी काय काय करता येईल यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राज्य सरकारने मार्गदर्शन मागविले असता, त्यात राज्यातील ३३ टोलनाके चालविणार्‍या ठेकेदारांनी आजवर या रस्त्यावरून जमा केलेली टोलची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम ठेकेदाराला देऊन टोलमुक्त रस्ते करणे शक्य असल्याचा अभिप्राय अलीकडेच सरकारला सादर केला आहे. या टोलनाक्यांमध्ये नाशिक जिल्‘ातील १३ टोलचा समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पराभवास टोलनाकेही कारणीभूत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या शिफारशींत नाशिक जिल्‘ाला अधिक प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे. बांधकाम खात्याने शिफारस केलेल्यांमध्ये सोग्रसफाटा ते दहीवेल रस्त्यावरील भाबडबारी, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर व अंदरसूल, चांदवड-मनमाड रस्त्यावरील दुगाव, नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील ढकांबे, वणी-कळवण रस्त्यावरील नांदुरी, मालेगाव-चाळीसगाव रोडवरील पिलखोड, सिन्नर-घोटी रस्त्यावरील सिन्नर नजीक, येवला-कोपरगाव रस्त्यावरील येसगाव या जुन्या नऊ टोलनाक्यांचा समावेश आहे. सर्वाधिक डोकेदुखी ठरलेल्या मुंबई-आग्रारोडवरील घोटी, पिंपळगाव बसवंत व चांदवड हे तीन टोलनाके बंद करता येऊ शकतात काय यादृष्टीनेही सार्वजनिक बांधकाम खात्याने चाचपणी केली आहे; परंतु सदरचे टोलनाके केंद्र सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने केंद्र सरकारकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास व तसा निधी ठेकेदाराला केंंद्र सरकारने उपलब्ध करून दिल्यास या तीनही महत्त्वाच्या टोलच्या कटकटीतून सुटता येऊ शकते, असे मत बांधकाम खात्याने व्यक्त केले आहे. शासकीय पातळीवर या वृत्तास दुजोरा देण्यात आला असला, तरी शासन याबाबत कधी निर्णय घेते याविषयी अधिकार्‍यांनी अनभिज्ञता दर्शविली.