शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पहिल्या आठवड्यातच १२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:32 IST

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे. विशेष म्हणजे समाधानाची बाब म्हणून दुष्काळी ओळखल्या जाणाºया मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यांत तर या पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे.नाशिक जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्केच पाऊस झाला होता. यंदा मात्र हेच प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर मान्सूनच्या आगमनाकडे साºयांचे लक्ष लागून होते. तथापि, गुरुवार, शुक्रवारी पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली आणि नाशिक, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेवर, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांना जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५ मिलीमीटर पाऊस झाला.त्यातून जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या १२ टक्के पाऊस नोंदविला गेला.या पावसामुळे मालेगावला ११४, बागलाणला १३८, देवळा १२२, सिन्नरला १२१ टक्के पाऊस झाला आहे. हे सारे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओेळखले गेले आहेत. आजवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी नोंदविला गेला असून, त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे.---------------------------पावसाचे पाणी सोडून देण्याची वेळशुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यातच दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अशातच नांदुरमधमेश्वर बंधाºयात अगोदरपासूनच १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत जवळपास तीनशेहून अधिक क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले. हे पाणी पुढे नगर जिल्ह्याकडे झेपावले.

टॅग्स :Nashikनाशिक