शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

येवला साठवण तलावात १२ दलघफू पाणीसाठा

By admin | Updated: January 12, 2016 00:29 IST

दखल : तीन दिवसात भरणार तलाव

येवला : पालखेड कालवा प्रशासन, पोलीस यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याने व पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून अनधिकृत उपसा झाला. अशा स्थितीत ‘लोकमत’ने पाणी वितरण पद्धतीवरच प्रहार करत पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवस जागर केला. याचा दृश्य परिणाम येवल्यात दिसला आहे. शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान १२ दलघफू पाण्याचा साठा सोमवारी करता आला. आणखी तीन दिवसात किमान ४५ दलघफू पाणी साठवण तलावात भरण्याचे उद्दिष्ट आहे.दरम्यान, येवला शहर व तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले होते. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक डोंगळे तोडले गेले. दांडगाई काही अंशी कमी झाली आणि पाण्याचा वेग रविवारी वाढला. त्यामुळे किमान काहीअंशी तरी येवल्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ५ दिवस लागतील असे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले. पालिका व इरिगेशन यांचे संयुक्त पथक सध्या पाण्याच्या टेहळणीवर आहे. शिवाय अनेक भागातील ७० ते ८० डोंगळे काढण्याची कारवाई पथकाने केली आहे. शहर साठवण तलाव आणि ३८ गाव पाणीपुरवठा साठवण तलाव एकाच वेळी भरून घेण्याचे काम सध्या चालू आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. ‘लोकमत’ने पालखेडचे पाणीचोरीचा जागर गेले दोन दिवस केल्याने किमान येवल्यासह अनेक भागांना किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब लहरे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)