शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

येवला साठवण तलावात १२ दलघफू पाणीसाठा

By admin | Updated: January 12, 2016 00:29 IST

दखल : तीन दिवसात भरणार तलाव

येवला : पालखेड कालवा प्रशासन, पोलीस यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याने व पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून अनधिकृत उपसा झाला. अशा स्थितीत ‘लोकमत’ने पाणी वितरण पद्धतीवरच प्रहार करत पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवस जागर केला. याचा दृश्य परिणाम येवल्यात दिसला आहे. शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान १२ दलघफू पाण्याचा साठा सोमवारी करता आला. आणखी तीन दिवसात किमान ४५ दलघफू पाणी साठवण तलावात भरण्याचे उद्दिष्ट आहे.दरम्यान, येवला शहर व तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले होते. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक डोंगळे तोडले गेले. दांडगाई काही अंशी कमी झाली आणि पाण्याचा वेग रविवारी वाढला. त्यामुळे किमान काहीअंशी तरी येवल्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ५ दिवस लागतील असे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले. पालिका व इरिगेशन यांचे संयुक्त पथक सध्या पाण्याच्या टेहळणीवर आहे. शिवाय अनेक भागातील ७० ते ८० डोंगळे काढण्याची कारवाई पथकाने केली आहे. शहर साठवण तलाव आणि ३८ गाव पाणीपुरवठा साठवण तलाव एकाच वेळी भरून घेण्याचे काम सध्या चालू आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. ‘लोकमत’ने पालखेडचे पाणीचोरीचा जागर गेले दोन दिवस केल्याने किमान येवल्यासह अनेक भागांना किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब लहरे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)