शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

११२ घरे भस्मसात, ६५० नागरिक बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:52 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

ठळक मुद्देमनपाकडून पंचनामा : नुकसानभरपाईबाबत आज निर्णय

नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.गंजमाळ हा शहराच्या मध्यवस्तीतील रहिवासी भाग असून, दाट वस्तीच्या या भागात शनिवारी (दि.२५) अचानक आग लागली. अनेक घरांत सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि आग आटोक्यात आणली. मात्र, त्यानंतरही अनेक घरे भस्मसात झाली, तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे. एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतरदेखिल जीवितहानी टळली ही या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली.दरम्यान, आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी. डी. भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली. याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले. त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, ६५० नागरिक बेघर झाल्याचा अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांनातातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. दरम्यान रविवारी या नागरिकांना विविध संस्थांतर्फे मदत देण्यात आली.भीमवाडी आणि महापालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालयातील अंतर अत्यंत कमी असतानादेखील अग्निशमक दलाचे बंब वेळेत पोहोचले नाहीत, त्याचप्रमाणे संपूर्ण आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजू देसले यांनी केली आहे, तर याठिकाणी झोपडपट्टी घोषित करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी तसेच अर्धवट स्थितीत असलेली महापालिकेची घरकुल योजना पूर्ण करावी, अशी मागणी शेकापचे अ‍ॅड. मनीष बस्ते यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग