शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १०४ दुचाकीचालकांचा रस्ते अपघातात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:14 IST

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता ...

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता येऊ शकते, असा या म्हणीचा अर्थ होतो अन‌् डोक्याचे महत्त्वही अधोरेखित होते; मात्र हेल्मेटचा कंटाळा करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. मागीलवर्षी शहरात दुचाकी अपघातात १०४ व्यक्तींचा बळी गेला. यापैकी केवळ १३ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर केल्याचे आढळून आले. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला; मात्र उर्वरित ९१ दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता आणि हे त्यांच्या जिवावर बेतले.

हेल्मेट हैं जरुरी, ना समजो इसे मजबुरी’ हे घोषवाक्य शहरात बहुतांश रिक्षांसह अन्य वाहनांवर तसेच भित्तीफलकांवर आणि सिग्नलवरील फलकांवर वाचावयास मिळते; मात्र याबाबत नाशिककरांमध्ये अद्यापही फारशी जागरुकता आल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत नाही. अनेक दुचाकीस्वार तर केवळ हेल्मेट दाखविण्यासाठी सोबत बाळगतात. हेल्मेट त्यांच्या डोक्यात नव्हे, तर आरशावर किंवा दुचाकीला पाठीमागे लटकविलेले असते. हेल्मेटसोबत असल्याचा हा देखावा जिवावरही बेतणारा ठरू शकतो. शहरात सध्या हेल्मेट वापराबाबत शहर वाहतूक पोलिसांकडून सक्ती केली जात नसली, तरीदेखील आपल्या जिवाची काळजी म्हणून दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर गरजेचाच असून, हादेखील एक रस्ता सुरक्षेचा एक भाग आहे, हे विसरुन चालणार नाही.

या नवीन वर्षात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सालाबादप्रमाणे राबविले जात आहे. नाशिककरांनी दुचाकीने विनाहेल्मेट प्रवास करणारच नाही, असा संकल्प यानिमित्ताने करायला हरकत नाही. तरच २०२१अखेर दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा कमी होईल, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

---इन्फो---

...म्हणून हेल्मेट गरजेचे

हेल्मेट परिधान करणे हे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. दुचाकींच्या अपघातात वाढ झाली असून, कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चपासून मे महिन्यांपर्यंत अपघातांचे प्रमाण कमी राहिले होते; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघात वाढले आहे. हेल्मेटचा वापर हा अत्यावश्यक आहे. कारण शरीराचा सर्वात महत्त्वाचा अन‌् तितकाच नाजूक अवयव अर्थात मेंदूच्या सुरक्षेसाठी ते एकप्रकारचे सुरक्षा कवचच आहे. हेल्मेटमुळे मेंदूसाठी असलेले नैसर्गिक कवचदेखील शाबूत राहण्यास मदत होते, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

---पॉइंटर्स--

* * * * * * * * * *सर्वात जास्त अपघात (७१%) अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे निष्पन्न.

*सर्वाधिक अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले (५०.०३%)

* सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत सर्वाधिक अपघात.

*डोक्याला जबर मार लागून जागीच तसेच उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त.

-----

२१ हेल्मेट नावाने फोटो आर वर सेव्ह