शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शहरात १०४ दुचाकीचालकांचा रस्ते अपघातात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:14 IST

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता ...

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता येऊ शकते, असा या म्हणीचा अर्थ होतो अन‌् डोक्याचे महत्त्वही अधोरेखित होते; मात्र हेल्मेटचा कंटाळा करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. मागीलवर्षी शहरात दुचाकी अपघातात १०४ व्यक्तींचा बळी गेला. यापैकी केवळ १३ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर केल्याचे आढळून आले. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला; मात्र उर्वरित ९१ दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता आणि हे त्यांच्या जिवावर बेतले.

हेल्मेट हैं जरुरी, ना समजो इसे मजबुरी’ हे घोषवाक्य शहरात बहुतांश रिक्षांसह अन्य वाहनांवर तसेच भित्तीफलकांवर आणि सिग्नलवरील फलकांवर वाचावयास मिळते; मात्र याबाबत नाशिककरांमध्ये अद्यापही फारशी जागरुकता आल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत नाही. अनेक दुचाकीस्वार तर केवळ हेल्मेट दाखविण्यासाठी सोबत बाळगतात. हेल्मेट त्यांच्या डोक्यात नव्हे, तर आरशावर किंवा दुचाकीला पाठीमागे लटकविलेले असते. हेल्मेटसोबत असल्याचा हा देखावा जिवावरही बेतणारा ठरू शकतो. शहरात सध्या हेल्मेट वापराबाबत शहर वाहतूक पोलिसांकडून सक्ती केली जात नसली, तरीदेखील आपल्या जिवाची काळजी म्हणून दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर गरजेचाच असून, हादेखील एक रस्ता सुरक्षेचा एक भाग आहे, हे विसरुन चालणार नाही.

या नवीन वर्षात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सालाबादप्रमाणे राबविले जात आहे. नाशिककरांनी दुचाकीने विनाहेल्मेट प्रवास करणारच नाही, असा संकल्प यानिमित्ताने करायला हरकत नाही. तरच २०२१अखेर दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा कमी होईल, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

---इन्फो---

...म्हणून हेल्मेट गरजेचे

हेल्मेट परिधान करणे हे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. दुचाकींच्या अपघातात वाढ झाली असून, कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चपासून मे महिन्यांपर्यंत अपघातांचे प्रमाण कमी राहिले होते; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघात वाढले आहे. हेल्मेटचा वापर हा अत्यावश्यक आहे. कारण शरीराचा सर्वात महत्त्वाचा अन‌् तितकाच नाजूक अवयव अर्थात मेंदूच्या सुरक्षेसाठी ते एकप्रकारचे सुरक्षा कवचच आहे. हेल्मेटमुळे मेंदूसाठी असलेले नैसर्गिक कवचदेखील शाबूत राहण्यास मदत होते, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

---पॉइंटर्स--

* * * * * * * * * *सर्वात जास्त अपघात (७१%) अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे निष्पन्न.

*सर्वाधिक अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले (५०.०३%)

* सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत सर्वाधिक अपघात.

*डोक्याला जबर मार लागून जागीच तसेच उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त.

-----

२१ हेल्मेट नावाने फोटो आर वर सेव्ह