शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला कोणतेही पद नको; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
4
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
5
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
6
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
7
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
8
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
9
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
10
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
11
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
12
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
13
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
14
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
16
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
17
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
18
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
19
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
20
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना

शहरात १०४ दुचाकीचालकांचा रस्ते अपघातात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:14 IST

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता ...

नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता येऊ शकते, असा या म्हणीचा अर्थ होतो अन‌् डोक्याचे महत्त्वही अधोरेखित होते; मात्र हेल्मेटचा कंटाळा करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. मागीलवर्षी शहरात दुचाकी अपघातात १०४ व्यक्तींचा बळी गेला. यापैकी केवळ १३ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर केल्याचे आढळून आले. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला; मात्र उर्वरित ९१ दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता आणि हे त्यांच्या जिवावर बेतले.

हेल्मेट हैं जरुरी, ना समजो इसे मजबुरी’ हे घोषवाक्य शहरात बहुतांश रिक्षांसह अन्य वाहनांवर तसेच भित्तीफलकांवर आणि सिग्नलवरील फलकांवर वाचावयास मिळते; मात्र याबाबत नाशिककरांमध्ये अद्यापही फारशी जागरुकता आल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत नाही. अनेक दुचाकीस्वार तर केवळ हेल्मेट दाखविण्यासाठी सोबत बाळगतात. हेल्मेट त्यांच्या डोक्यात नव्हे, तर आरशावर किंवा दुचाकीला पाठीमागे लटकविलेले असते. हेल्मेटसोबत असल्याचा हा देखावा जिवावरही बेतणारा ठरू शकतो. शहरात सध्या हेल्मेट वापराबाबत शहर वाहतूक पोलिसांकडून सक्ती केली जात नसली, तरीदेखील आपल्या जिवाची काळजी म्हणून दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर गरजेचाच असून, हादेखील एक रस्ता सुरक्षेचा एक भाग आहे, हे विसरुन चालणार नाही.

या नवीन वर्षात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सालाबादप्रमाणे राबविले जात आहे. नाशिककरांनी दुचाकीने विनाहेल्मेट प्रवास करणारच नाही, असा संकल्प यानिमित्ताने करायला हरकत नाही. तरच २०२१अखेर दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा कमी होईल, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

---इन्फो---

...म्हणून हेल्मेट गरजेचे

हेल्मेट परिधान करणे हे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. दुचाकींच्या अपघातात वाढ झाली असून, कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चपासून मे महिन्यांपर्यंत अपघातांचे प्रमाण कमी राहिले होते; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघात वाढले आहे. हेल्मेटचा वापर हा अत्यावश्यक आहे. कारण शरीराचा सर्वात महत्त्वाचा अन‌् तितकाच नाजूक अवयव अर्थात मेंदूच्या सुरक्षेसाठी ते एकप्रकारचे सुरक्षा कवचच आहे. हेल्मेटमुळे मेंदूसाठी असलेले नैसर्गिक कवचदेखील शाबूत राहण्यास मदत होते, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

---पॉइंटर्स--

* * * * * * * * * *सर्वात जास्त अपघात (७१%) अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे निष्पन्न.

*सर्वाधिक अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले (५०.०३%)

* सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत सर्वाधिक अपघात.

*डोक्याला जबर मार लागून जागीच तसेच उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त.

-----

२१ हेल्मेट नावाने फोटो आर वर सेव्ह