१९६ मुख्याध्यापक होणार पदावनतनाशिक : यंदाच्या वर्षापासून शिक्षण हक्क कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यानुसार जिल्ात १५८८ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. येत्या १५ जूनपासून त्यानुसार १०१२ पदवीधर शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.पदवीधर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती होणार असतानाच, विद्यमान मुख्याध्यापकांना मात्र पदावनत होण्याची वेळ येणार आहे. शिक्षक हक्क कायद्यानुसार जिल्ात ५०२ मुख्याध्यापकांची आवश्यकता असून, सद्यस्थितीत ६९८ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त व सेवानिवृत्त होणार्या मुख्याध्यापकांची संख्या मिळून सुमारे १९६ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार असून, त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे कळते. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ात १५८८ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता असून, कार्यरत पदवीधर शिक्षक वगळता १०१२ पदवीधर शिक्षकांची जूनपासून जिल्हा परिषदेत भरती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत १०१२ पदवीधर शिक्षकांची भरती
By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST