शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

गंगापूर धरणात १०१ टक्केसाठा : पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:02 IST

: गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्केपाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला असून, भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणाºया पाण्याला ब्रेक लावला आहे.

नाशिक : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्केपाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला असून, भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणाºया पाण्याला ब्रेक लावला आहे.  आॅगस्ट महिन्यात जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही मोठा विसर्ग करण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी २२ टीएमसी पाणी पोहोचले. परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शेवटच्या आठवड्यात पावसाचे धुवाधार पुनरागमन झाल्याने गंगापूर धरण पाणलोट क्षेत्राचा लाभ धरण समूहाला झाला.  अजूनही त्र्यंबकेश्वर, आंबोली या भागात पावसाची कमी अधिक हजेरी असल्यामुळे गंगापूर धरण १०१ टक्के भरले तर या धरण समूहातील कश्यपी ९९, गौतमी गोदावरी ९८ व आळंदी धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गंगापूर धरणात ९४ टक्के, तर समूहात ९६ टक्केजलसाठा होता.जिल्ह्यातील धरणे  झाली फुल्लजिल्ह्यातील आठ धरणे शंभर टक्केफुल्ल झाली असून, जवळपास सर्व धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा झाला आहे. शंभर टक्केभरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझरचा समावेश आहे. त्यातील गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, चणकापूर या धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८५ टक्के भरली होती.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणRainपाऊस