शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात १०१ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 15:46 IST

विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे.

ठळक मुद्देआकडा शंभरी पार : पंधरा वर्षातील उच्चांकशुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तु ढोकणे या शेतक-याने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा वर्षातील हा उच्चांक मानला जात असून, आगामी निवडणुकीत हा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यशवंत दत्तु ढोकणे (६५) यांच्या नावावर बारा ते तेरा हेक्टर क्षेत्र शेवगे दारणा व पळसे येथे असून, त्यांच्या नावे आयडीबीआय बॅँकेत सात ते आठ लाख रूपये कर्ज आहे तसेच सोसायटीचेही तीन लाख रूपये कर्ज आहे. ते स्वत: बीएसएनएलमधून सेवा निवृत्त झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला. ढोकणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुन, तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, कर्जबाजारीपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, दर महिन्याला सरासरी आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत.विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील प्रल्हाद नथु अहिरे (६०) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणा-या शेतक-यांची संख्या शंभर झाली होती, त्यात शनिवारी यशवंत ढोकणे यांच्या आत्महत्येने भर पडली आहे. नाशिक तालुका त्या मानाने सधन मानला जात असतानाही शेतक-याने आत्महत्या केल्याने एकट्या तालुक्यात चार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात सन २००२ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, तेव्हापासून त्यात सातत्याने वाढच होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेर ८७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र समाधानकारक पाऊस व शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने हा विषय आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मुद्दा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक